Monday, December 3, 2012

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे

सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृती आणि वैदीक संस्कृती च्या काळाचे कोडे
=======================================
"On one hand we have the vast Vedic literature without any Archaeological evidence to support it, while on the other hand we have almost 2500 Archaeological sites associated with the Indus-Saraswati civilization without any literature associated with it. "
- Professor David Frawley

* साधारण
पणे सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० पर्यंत सांगीतला जातो, व साधारण ई,स.पू २००० ते १६०० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होत होत सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली असे मानले जाते.

* सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० असा मानला तर ऋग्वेदाचा काळ १६०० च्या पुढे निश्च्ति केला जातो, कारण ना ऋग्वेदा मध्ये सिंधु परिस्थितिचा संदर्भ येतो आणि ना सिंधु काळामध्ये काही वैदीका प्रमाण मिळतात.

* ऋग्वेदाची रचना सरस्वती नदी अस्तित्वात असताना झाली आहे हे स्पष्टच आहे , आणि सरस्वती नदीच्या खालच्या भागातील पाणी इ.स.पू २००० पासुन आटू लागले याचाच अर्थ ऋग्वेदाची रचना ई.स.पू २००० पुर्व झाली असली पाहीजे हे स्पष्ट होते.

* पण काही विद्वान ऋग्वेदाचा काळ इ.स.पू १६०० च्या पुढे असावा असे मानत नाहीत , ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्भशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]

* ऋग्वेदाचा काळ हा सिंधु / हडप्पा संस्कृती नंतरचा असे मानन्यात अडचण ही आहे की जेथे वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे हडपा संस्कृतीतील सिंधु-सरस्वती वासीयांना स्थलांतरीत होण्यात भाग पाडले ( काळ साधारन ई.स.पू १७०० - १६०० ) त्याच काळानंतर म्हणजे पर्यावरण प्रतिकुल असतानाच त्याच ठिकाणी ( सिंधु-सरस्वतीचे खोरे ) वैदीकांनी आपले वस्थिस्थान वसवले हे पटत नाही व त्यानंतर रामायण महाभारतादी घडले असे जर मान्य केले तर पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत, पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .

* आणि असे जर असेल तर रामायण महाभारतादी काव्हे ही फक्त मिथक आहेत असे मानावेल लागेल , परंतु त्यातही एक अडचण आहे ती अशी की वैदीक ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* अलिकडे पश्चिम आशियातील कोरीव लेखात काही व्यक्तीनामे आढळून आली आहेत त्यांपैकी दोन नाव्रे "सोमसेन" व दुसरे "अरीसेन". ही नावे ज्या लेखात सापडली त्याचा काळ आहे ई.पू. २३०० , त्यावेळी सिंधू संस्कृती पुर्णपणे सुबत्तेच्या शिखरावर पोहोचली होती. ही दोन्ही नावे इंडॊ-आर्यन असुन पुर्णपणे भारतीय आहेत. याबद्दल विद्वानांत दुमत नाही. म्हणजे हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती, तसेच सिंधु संस्कृती जर अनार्य द्रविडींची असे मानले, तर हे इंडॊ-आर्यन शब्द इ.स.पू २३०० मध्ये भारतातुन येणे कसे शक्य आहे ?

* आणि जर हडप्पा कालीन संस्कृती च्या सुमारास वैदीक संस्कृती अस्तित्वात होती असे जर मानले तर हडप्पा कालीन संस्कृतीच्या उत्खननांमधुन वैदीक संस्कृती शी साम्य असलेले काहीच प्रमाण मिळालेले नाही . म्हणजे जरी दोन्ही संस्कृती समकालीन आहे असे मान्य केले तर कोणत्याही उत्खननामध्ये वैदीक कालीन पुरावे आजपर्यंत का सापडलेले नाहीत ?

* आर्यांनी आपला इतिहास खुप मोठ्या प्रमाणावर लिहुन ठेवला आहे रामायण , महाभारता सारखी महाकाव्ये ही केवळ काव्ये नसुन सत्य इतिहास असावा हे जवळ जवळ सर्वमान्य आहे . महाभारताचा काळ काढला असता तो ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० इतका मागे जातो. हे केवळ रामायण - महाभारताचे , त्याचप्रमाणे वैदीक साहित्यानुसार असे कित्तेक राजे आणि महाराचे होऊन गेले , परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक पुरातत्विय उत्खननामध्ये अवशेश म्हणुन असे काही सापडलेले नाही पण ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे गावे-नगरे यांची ठीकाणे सापडतात (उदा. अशोकवाटीका).

* इ.स.पू. १५,००० ते १०,००० च्या मध्ये भयंकर प्रलय आला होता , व त्यात भारताचा बराच भाग समुद्राखाली गेला असे संशोधक मानतात. भागवत पुराणामध्ये अयोध्या नगरी समुद्राने नष्ट केल्याचे वर्णन आहे व त्यानंतर कलियुगाची सुरवात झाली असे सांगीतले आहे. याचा अर्थ द्वापारयुगाचा शेवट इ.स.पू. १०,००० च्या आसपास झाला असे मानायचे का , आणि या अति अति प्राचीन काळामुळेच त्यांचे अवशेष आज आपल्याला सापडत नाही आणि त्या आधीही भारतामध्ये प्रगत अशी संस्कृती नांदत होती असे म्हणु शकतो असे असु शकेल ? आणि असेच जर मानायचे ठरवले तर दोन मोठ्या अडचणी आहेत , एक म्हणजे इ.स.पू. १०,००० च्या आधी महाभारत घडले हे मानावे लागते पण बरेच विद्वान महाभारताचा काळ ई. पू. ५००० ते ई. पू. ३००० च्या मध्ये मानतात व दुसरी अडचण अशी की ई पू १०००० च्या आधी एक संस्कृती नांदत होती , १०००० च्या आसपास महाप्रलय आला त्यामध्ये बर्‍यापैकी सगळे नष्ट झाले त्यानंतर तब्बल सात ते आठ हजार वर्षानंतर सिंधु/ हडपा संस्कृती भारतात उदयास आली जिचे अवषेश आज मिळतात. या मधल्या सात आठ हजाराच्या कालखंडामध्ये काही अर्य वैदीकांनी आपली संस्कृती सांभाळली असे मानायचे का ? आणि असे जर मानले तर ते लोक सिंधु काळात कुठे होते ? 

Monday, November 19, 2012

बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारला नाही ही त्यांची चूक होती का ??

काही दिवसांपुर्वी माझा बौद्ध मित्र पियुश खोब्रागडे याच्या ब्लॉग वरील "काय आपण बुद्धाचा महार करुन ठेवलाय ?" हा एक अतिषय सुंदर व अंतर्मुख करणारा लेख वाचनात आला, अपेक्षीत आणि दुर्लक्षीत अशा एका मुद्द्यामध्ये पियुष ने हात घातला होता याबद्दल मी त्याचे कौतूक करीन. जे "खरे बौद्ध" आहेत किंवा ज्यांना, भगवान बुद्धांच्या शिकवणूकीने चालणारे , आर्य अष्टांगमार्ग पाळणारे,  भगवान बुद्धांनी सांगीतल्याप्रमाणे अध्यात्मिक व पारमार्थीक साधना करणारे पियुश सारखे ज्यांना "बौद्ध" म्हणावे असे बौद्ध खुप कमी भेटत आहेत. आणि बौद्ध धर्माचा आधार घेवून स्वत:चे नाकर्तुत्व झाकण्यासाठी हिंदु धर्मावर टिका करणारे बौद्ध हे आपल्याला आज जागोजागी आढळतात, आणि याचमुळे समाजात बौद्ध धर्माचा आणि भगवान बुद्धांची प्रतिमा अतिशय मलीन होत आहे या गोष्टीचा  सर्व "बौद्ध" बांधवांनी विचार केला पाहीजे, बाबासाहेब आंबेडकरांनी कटाक्षाने नविन एखादा धर्म स्थापन न करता व ईस्लाम किंवा ख्रिस्ती सारखे परके धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला, हे काही लोक विसरत चालले आहेत व त्याच बाबासाहेबांच्या नावाने आणी त्याच बौद्ध धर्माचा आधार घेवून हे अविचारी लोक इस्लाम व ख्रिस्ती धर्माला पुरक असे काम करत आहेत यामध्ये बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा अपमानच नाही का ?  तथाकथीत शिवधर्मी लोकांना मी नेहमी विचारत असतो की अशी काय कमी बौद्ध धर्मामध्ये होती की त्यांनी बौद्ध धर्मालाही लाथाडून स्वत:चा असा नविन धर्म काढला  ?? त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांनी  नविन धर्म स्थापण न करता बौद्ध धर्म स्विकारला ही बाबासाहेबांची चूक होती असा चुकीचा समज समाजात पसरत आहे याचा विचार होणार आहे की नाही माहीत नाही. आणि याचमुळे कदाचीत मधुकर रामटेकेंसारखे बौद्ध विचारवंत या तथाकथीत नविन धर्म वाल्यांच्या नवधर्माला विरोध करत म्हणतात, "जय भीम ला रिप्लेस करतोय जय मुलनिवासी". रामटेके सरांनी या तथाकथीत दिखाऊ नविन धर्म वाद्यांची दिखाऊ बौद्ध भक्ती पुरेपूर उघडी पाडली आहे. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु धर्मावर टिका करन्याचे सर्टिफिकिट , मग त्या बुद्धांची शिकवण काय आहे हे भले माहीत नसो , त्या आर्य अष्टांगमार्गचा आम्हाला गंध ही नको असे काही समिकरण झाले आहे आणि असे होत होत अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म बदनाम होत आहे याचा विचार बौद्ध विचारवंतांनी व भगवान बुद्धांच्या तत्वांशी प्रामाणीक असणार्‍या माझ्या बौद्ध बांधवांनी अवश्य करावा. मगे महाविर सांगली करांच्या ब्लॉग मध्ये वाचले होते की बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता म्हणुन बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म स्वीकारण्यागोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता पण या दोन्ही धर्मांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराला विरोध त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला, आणि त्याचीच फळे आज भगवान बुद्ध व बौद्ध बंधव आज भोगताना दिसत आहेत. आजपर्यंत मला जेजे नवबौद्ध भेटले त्यांपैकी एकालाही भगवान बौद्धांची आर्य अष्टांगमार्ग माहीतही नाहीत काय आहेत ती यावेळी यांच्या तोंडून चकार शब्द ही फुटत नाही परंतु हिंदु धर्म आणि वर्णव्यवस्था / जातव्यवस्था असे विषय काढायचा अवकाश, जिवाच्या आकांताने चर्चेत सहभागी घेतात (नुसते बोलायला काय जाते म्हणा ..). ज्या वर्णवादाचा आणि जातीवादाचा शिक्का पुसला जावा म्हणुन बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला त्याच बौद्ध धर्माच्या आडोशाला उभारुन आता आपल्या जे काही असतील त्या वर्णाचा आणि जातीचा अभिमान बाळगताना हे लोक दिसत आहेत (शुद्रा: द रायजिंग म्हणे ..). अरे  आधी स्वत: ठरवा की आपल्याला नेमके काय करायचे आहे, जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत कि त्या तशाच ठेवुन त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. हे ही साधे विषय स्पष्ट नसणारे मुर्ख मनु:स्मृती / वर्णव्यवस्था वगैरे वगैरे गोष्टी करत आहे हे पाहुन खुप हसू येते.

    बाबासाहेबांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म कटाक्षाने टाळले त्याच धर्मांचा अप्रत्यक्षपणे स्विकार शिवधर्माच्या माध्यमातुन बाबासाहेबांचेच नाव घेवून केला जात आहे. सन २००१ मध्ये डबरण येथे WCC (Word Church Council)  चे विश्वसंमेलन झाले, त्यामध्ये  भारतीय दलीत नेत्यांनी सुद्धा हजेरील लावली. पाकीस्तान मधील झाईद हमीद सारख्या भारतद्वेश्टा म्हणतो "भारतामध्ये काही हिंदु (गझुआ-ए-हिंद) अलाह चे पवित्र कार्य एक हिंदु रहुनच करत आहे" याचा अर्थ काय घ्यायचा ?? याच विद्रोही लोकांच्या घरी परदेशी चलन सापडले, या लोकांनी आता शिवरायांच्या नावाने मुस्लिम ब्रिगेडही चालू केली आहे आहे आणि या मुस्लिम ब्रिगेड च्या कार्यक्रमांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात ,..... या सगळ्या गोष्टिंचा काय अर्थ होतो ? तथाकथीत काही विद्रोही लोक भगवान बुद्धांचे नाव घेवु भोळ्या बौद्ध बांधवांना चुकिच्या आणि विरुद्ध दिशेने घेवुन जात आहेत हे बौद्ध बांधवांनी समजुन घेतले पाहीजे, भगवान बुद्ध हे हिंदु धर्मीयांना कधीही प्रियच आहेत, बुद्धांनी तर कधीच जातीवाद मानला नाही त्यांचे महाम्मोगल्लान सारखे अनेक शिष्य हे त्याकाळी वरिष्ठ अशा समजल्या जाणार्‍या समाजातील होते, भगवान बुद्धांना विष्णुचे नववे अवतार हिंदु मानतात (बुद्ध हे विष्णूचे अवतार होते की नाही याची चर्चा मला इथे करायची नाहीये .) सांगण्याच उद्देश येवढाच की भगवान बुद्ध हे हिंदुंना वंदनियच आहे परंतु काही लोकांनी भगवान बुद्धांची प्रतीमा समाजामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे (बर्‍याचशा प्रमाणात  केली ही आहे ) . तो आपल्याला हानुन पाडायचा आहे.

Sunday, November 11, 2012

महाभारतातील वर्णवाद : एकलव्य ??

सध्या वैदिक पुराण, ग्रंथामधील कथा व घटनांना ओढून ताणून जातियवाद लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे , अशा लोकांच्या अपप्रचाराच्या गळाला लागलेली असा एक घटन म्हणजे "एकलव्य". वैदीक काळातही अश्पृष्यता होती हे ठासुन सांगताना मेकॉलेचे आजचे तथाकथीत हस्तक हे एकलव्याचे उदाहरण देतात व द्रोणाचार्यांनी एकलव्याला तो हिन कुळातील असल्यामुळे त्याला धनुर्विद्येचे शिक्षण घेता येणार नाही असे म्हटले. असा मुळ घडनेला (काही प्रमाणात  मुळ कथा तोडून ) युक्तिवाद करतात. सर्वात पहिलि गोष्ट म्हणजे आजचे मेकॉलेचे हस्तक इंग्रजांप्रमाणे रामायण , महाभारत वगैरे मिथक मानत आहेत, म्हणजे महाभारत घडलेच नाही असे यांचे मत आहे , असे असताना हे लोक द्रोणाचार्यांचे - एकलव्याचे उदाहरण देतात हे विषेश आहे.
    तर वेदकाळात कोणत्याही प्रकार चा "जातीयवाद" अस्तित्वात नव्हता हे आता समाजासमोर आलेले आहे, होता तो वर्णवाद, त्याकाळी माणसाला वर्ण बदलता येत होता कारण वर्ण हा त्याच्या व्यवसायावर आधारीत होता जातीवर नाही [ उदा. विश्वामित्र हा क्षत्रिय होता तरी तो पुरोहीताचा व्यवसाय करीत असे ]. आणि जात ही जन्मावर आधारीत असल्यामुळे ती बदलता येत नाही. एकलव्य हा हिन कुळातील होता असा उल्लेख आहे त्याला "द्रोणाच्यार्याकडूनच" धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे होते , परंतु याठीकाणी एक गोष्ट बहुतेकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे द्रोणाचार्य यांना  त्यावेळी राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी नेमले होते व इतर लोकांसाठी कृपाचार्य विद्या देत, महाराथी कर्ण हे त्याचे उदाहरण. कर्ण त्या वेळी सुतपुत्र म्हणुन प्रसुत होता , त्याचीही द्रोणाच्यार्यांकडून आपणास धनुर्विद्येचे शिक्षण मिळावे असा कायस होता परंतु द्रोणाचार्य हे राजपुत्रांसाठी नेमलेले होते, त्यामुळे कर्णाला नाईलाजाने कृपाचार्यांकडे शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे महाभारत काळात क्षत्रीय सोडून इतरांना शिक्षण / विद्या  घेण्याचा अधीकार नव्हता हा मुद्धा मोडीत निघतो. आता राहीला प्रश्न द्रोणाचार्यांनी एकलव्याला दिलेले उत्तर , ते म्हणतात "तु हिन कुळातील असल्यामुळे तुला माझ्याकडून विद्या घेता येणार नाही" . निट लक्ष दिले तर याठीकाणी एकलव्याला द्रोणाचार्यांकडून विद्या न मिळण्याचे कारण म्हणजे ...’तो हिन कुळातिल होता’ म्हणुन नव्हे , तर ’द्रोणाचार्यांना तेथील राजांनी तो अधीकार दिला नव्हता म्हणुन’ असे आहे . द्रोणाचार्य त्या त्यावेळी फक्त राजांच्या राजपुत्रांना विद्या देत होते आणि इतरांसाठी कृपाचार्यांची नेमणुक केली होती, द्रोणाचार्यांचा एकलव्य तसेच कर्णाप्रती नाईलाज होता म्हणुन त्यांना शिक्षा नाकारली, ना की त्यांचे कुळ हिन होते म्हणुन. कर्णाने निराश न होता कृपाचार्यांकडे विद्या ग्रहण करण्याच सुरवात केली परंतु एकलव्याने मात्र द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानले असल्यामुळे त्याने इतर कोणाकडून शिक्षा न घेता त्यांचा पुतळा तयार करुन स्वाभ्यासाने धनुर्विद्देचे सर्वोच्च शिखर गाठले, तोच प्रकार कर्णाचा कृपाचार्यांच्या हाताखाली शिक्षण घेवुनही त्याने अर्जुनाची बरोबरी गाठली. या हिन कुळाहीत समजले जाणारे असे दोन महान येद्धे [कर्ण हा क्षत्रीय होता हे नंतर समजले परंतु तो सुतपुत्र होता आणि त्याचप्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये झाले होते हे आपल्याला विसरुन चालणार नाही] यांचा आदर्श समोर घेवुन स्वत:ची आणि स्वत:च्या समाजाची प्रगती कशी होईल हे न पाहता काहीतरी कारणे काढून आपापसांत भांडणे लावली जात आहेत, काय म्हणावे अशांना.

Friday, October 26, 2012

ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे


सध्या बाजारामध्ये अनेक संघटना, पक्ष, चळवळी केवळ एका आधारावर उभ्या आहेत तो म्हणजे ब्राम्हणद्वेष !  ब्राम्हणद्वेष पसरवायचा आणि  आपले वैयक्तीक, पाक्षीक किंवा सांघटनीक स्वार्थ साधुन घ्यायचा असा एक ट्रेड चालू आहे. देशासमोर आ वासुन उभे असलेल्या समस्यांना, प्रश्नांना , अडचणींना बदल देवुन कोणी एके काळी ब्राम्हण समाजाने आमुक आमुक या समाजावर काहीतरी तमुक तमुक अन्याय केले हे जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगायचे (ओरडायचे कारण म्हणजे तो मुद्दा देशाच्या इतर प्रश्नांपेक्षा महत्वाचा वाटायला हवा यासाठी) आणि समोर बसलेल्या ठरावीक एका सामाजीक वर्गाला ज्याच्याकडे इतरांच्या तुलनेत बौद्धीक विचारक्षमता कमी आहे त्यांच्यापुढे वाघ म्हणुन मांजराला पुढे करायचे , जेणेकरुन जो खरा वाघ आहे त्याच्याकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. कसे का ? कारण म्हणजे या खर्‍या वाघाचे आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्‍यांचे साटेलोटे आहे हे सांगण्यासाठी काही मोठ्या तत्वज्ञाची गरज नाही.
थोडक्यात ब्राम्हणद्वेशावर या लोकांचे पोटपाणी चालू आहे. या ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे खनुन काढल्याशिवाय या तथाकथित ब्राम्हणद्वेशी लोकांचा स्वार्थ आणि यांचे खरे जावाई आणि घरजावाई कोण हे लक्षात येणार नाही .
भारतावरील ७११ साली पहिले इस्लामी आक्रमण झाले, त्यानंतर तब्बल ३०० वर्ष हिंदु योध्यांनी ही आक्रमणे थोपवुन धरली , त्यानंतर मात्र हिंदु प्रतिकार शिथिल होवून इस्लामी आक्रमणे तिव्र होवू लागले त्यापासुन पुढे साधारण ६०० वर्षे हिंदुस्थानामध्ये इस्लामी टोळधाडी, आक्रमणे, लुटालूट, हिंसाचार यांची पराकाष्ठा झाली, यामध्ये हिंदुस्थानातील हिंदुंचा स्वधर्माप्रती असलेला स्वाभिमान इस्लामी आक्रमाकांनी रसातळाला नेला, त्याचबरोबर अनेक वैदीक ग्रंथ व पुस्तके , अनेक ऐतिहासीक साधने नष्ट केली. त्यानंतर शिवरायांचा जन्म झाला व हिंदुस्थान इस्लाममय होण्यापासुन  वाचला. त्यानंतर इंग्रज आले , त्यावेळी वैदीक ग्रंथ , पुस्तके , साहित्य आणि ऐतिहासीक दस्तैवज विखुरलेले होते इंग्रजांनी हिंदुंचे हे विखुरलेले वैदीक साहीत्याचे आधुनिक पद्धतीने एकत्रिकरण करण्याचे ठरवले. आणि ते ही असे की जसे इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी सोईस्कर ठरेल अशा पद्धतीने आणि याच वैदीक साहित्याचे आधुनिकिकरण करताना इंग्रजांनी त्यामध्ये स्वत:च्या सोईनुसार भेसळ केली ज्याचा उपयोग इंग्रजांना त्यांच्या फोडा-झोडा आणि राज्य करा अशाप्रकारच्या राजकारणाला पुरेपूर झाला. त्यानी या वैदीक साहित्यामध्ये अशाप्रकारे भेसळ केली की ज्याद्वारे हिंदुंच्या मनात शंका निर्माण होतील. वस्तुत: इतिहास हा असा विषय आहे की तो कोणत्याही देश किंवा समाजाच्या विविध परंपरा तसेच मान्यता तसेच महापुरुशांच्या गौरवगाथा आणि संघर्षाच्या सामुहिक आढावा होय, ज्याचा उद्द्देश त्या देश अथवा समाजाची भावि पिढी त्यापासुन प्रेरणा घेवु शकेल. परंतु भारताचा इतिहास आज ज्या स्थितित आहे आहे त्या दृष्टीकोणातुन विचार केला असता निराशाच आति पडते. असो. तर इंग्रजांनी विस्कळीत अशा वैदिक ग्रंथांचे एकत्रिकरण आणि आधुनिकिकरण करत असताना त्यामध्ये अशाप्रकारच्या विकृती आणि फेरबदल केले की ज्यातुन पुढे सामाजीक कलहच निर्माण होईल जो इंग्रजांना राज्य करण्यासाठी आवश्यक होता. आणि या विकृती आणि फेरबदलाचा सरात मोठा उद्देश हा होता की भारतियांना त्यांच्या संस्कृती, महापुरुष आणि विद्वानांबद्दल घृणाच निर्माण व्हावी. कंपनी सरकार ने आपल्या उद्देशाच्या प्राप्ती साठी अशाप्रकारे बहुमुखी योजना बनवली या योजनेच्या अंतर्गत पाश्चात्य विचारवंत आणि वैज्ञानिकांनी, इतिहासकारांनी आणि शिक्षण-शास्त्रज्ञांनी, लेखक आणि अनुवादकारांनी, इंग्रज प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारकांनी भारताची प्राचिनता, व्यापकता, अविच्छिन्नता आणि एकात्मतेलाच नाही तर समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले. आणि याच अभियानाच्या अंतर्गत  असा प्रचार करण्यात आला भारतीय सभ्यता ही प्राचीन सभ्यता नाही, रामायण - महाभारत वगैरे घटना केवळ कल्पित आहेत वगैरे वगैरे आणि सत्तेत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा उचित लाभ मिळाला. आणि येथुनच सुरवात झाली ब्राम्हणद्वेशाची , त्या काळी ’इंग्रजांनी’ भारतीयांमध्ये वर सांगीतल्याप्रमाणे  समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले आजही विद्रोही तेच करत आहेत. या इंग्रजांच्या ब्राम्हणविरोधाबद्दल मोनियर विल्यम्स नावा्चा इंग्रज आपल्या "मॉडर्न इंडीया एण्ड दी इंडीयन्स" या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या पृष्ठ २६१ वर म्हणतो, "When the walls of the mighty fortrees of Brahmanism are encircled, undermined and finally stormed by the soldiers of the cross, the victory of christiannity must be signal and complete" म्हणजे "जेव्हा ब्राम्हणांची शक्तीशाली दुर्ग (मंदीरे) ख्रिस्ती सैनिकांद्वारे घेरली जातील, दुर्बल बनवली जातील आणि नष्ट केली जातील तेव्हाच ख्रिस्तिकरणाच्या पुर्ण विजयाचा संकेत मिळेल".
दुर्दैवाने इंग्रजांच्या नंतर तेच काम विद्रोह्यांच्या मार्फत अव्याहतपणे चालू आहे. आता या विद्रोह्यांना  कारण नसताना प्रतिसाद मिळणे कठीन आहे म्हणुन यांनी आता शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छ. संभाजी महाराज इत्यादी महापुरुषांच्या नावाने त्यांचे विरोधक असलेल्या आणि भारताला १५० वर्षे गुलाम करुन ठेवलेल्या इंग्रजांचे हेच मिशनरी काम पुढे चालवत आहेत. आणि याचेच सबळ उदाहरण म्हणजे आर्य-अनार्य वाद जो इंग्रजांनी स्वत:च्या सोईसाठी बनवला होता , आज याच बादाचा उपयोग हे विद्रोही जनतेची माथि भडकवायला आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायला करत आहेत.

Thursday, October 25, 2012

विद्रोहाचा अंत इथे .

          आज या देशा मध्ये, विषेशत: महाराष्ट्र आणि पंजाब जेथे देशातील लढवय्या समाज जो मराठा आणि शिख या नावानी वास करतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फुटीरतेची बिजे रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. येथला ब्राम्हणद्वेशाचा मुद्दा ही त्याच बिजांचा परिणाम आहे. आज महाराष्ट्रात विद्रोही म्हणत असलेल्याप्रमाणे नेमका किती प्रमाणात ब्राम्हण्यवाद चालु आहे आणि त्यामध्ये सध्याच्या ब्राम्हणांचा किती वाटा आहे याची जाणि जाणि तथाकथीत विद्रोह्यांना असल्यामुळेच कदाचीत हे विद्रोही क्षणो -क्षणी आपल्या अनुयायांची माथि भडकवायला नेहमी विकृत इतिहासाकडे जातात. इतिहासात यांनी असे केले , इतिहासात त्यांनी तसे केले म्हणुन आज आम्हि सराकट ब्राम्हण समाजाची कत्तल करण्याची भाषा करत आहोत, हे किति बरोबर आहे याचा विचार त्यांचे अनुयायी म्हणवणारे तथाकथीत सत्यशोधक, विद्रोही ( न जाणो आनखी काही विषेषणे आहे त्यांचा उल्लेख न करणेच योग्य) हे लोक का करत नाहीत मला कळत नाही. यांच्या या ब्राम्हणद्वेशाला सुशिक्षीत समाज भिक घालत नाही. तसेच सध्या यांच्या यांच्यातच मतभेद चालू आहेत या केवळ "हिंदु" विरोधासाठी एकवटलेल्या विभिन्न विचारसणीच्या टोळ्यांमध्ये आपल्या विचारसरणीला धरुन वादविवाद (याच्याही पुढे जाऊन थेट आरोप आणि शिव्याशापही) होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्रोही चळवळीतील अनेक मान्यवरांना काही विद्रोही लोकांचा अति-ब्राम्हणद्वेश अजिबात मान्य नाही , तर या अतिउत्साही ब्राम्हणद्वेश करणार्‍यांना काही प्रौढ मान्यवरांचे प्रौढ विचार पचनि पडत नाहीत.  ज्या बाबासाहेबांनी हिंदु देवदेवता व संतांना रामराम ठोकुन बौद्ध स्विकारला होता , त्याच बाबासाहेबांचे नाव घेवुन हेच विद्रोही त्याच बाबासाहेबांना त्याच हिंदु साधु संतांच्या पंक्तीत बसवुन त्यांच्यासोबत बाबासाहेबांचाही जयघोष करताना दिसतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायांच्या पचनी पडत नाही , तर विद्रोह्यांना या लोकांचा बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायीवाद हा अति-आंबेडकरवादी वाटतो. हे विद्रोही बौद्ध धम्म आणि भगवान बुद्धांना आपले मानतात तर दुसरीकडे बौद्ध धर्म न स्विकारता स्वत:चाच असा वेगळा धर्म काढून बुद्धांच्या अनुयायांना आपल्या या नव्या धर्मात येणयासाठी आवाहन करतात आणि ही गोष्ट बौद्ध अभ्यासकांच्या पचनी पडत नाही तेव्हा ते सरळ सरळ विद्रोह्यांना व त्यांच्या अनुयायांना बौद्ध धर्मातच यायचा सल्ला देतात. पण हा सल्ला विद्रोह्यांना पेलवत नाही. इतकेच काय तर हिंदु संकृतीवर बेंबीच्या देठापासुन ताशेरे ओढणारे अनेक विद्रोही नेते हे स्वत: घरी सत्यनारायणाची पुजा घालतात, घारामध्ये हिंदु पद्धतीचे सण-उत्सव साजते करतात , आणि याच्याही पलिकडे ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद म्हणुन राण उठवणार्‍यांना बायको कशी ब्राम्हण चालते हे मला आजतागायत पडलेले कोडे आहे. एकिकडे हिंदु धर्माने स्त्रियांना उंबरठ्यापलीकडे जाऊ दिले नाही म्हणुन हिंदु धर्माला शिव्या शाप द्यायच्या त्याच स्त्रियांची आजची परिस्थिति काय आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आजपर्यंत या लोकांनी काय प्रयत्न केले याची माहीती मला आजपर्यंत एकाही विद्रोह्यांनी दिलि नाहि, कदाचीत स्त्रिला हजार सालापुर्वी ज्यांनी कोंडून ठेवले त्यांच्या नावाने बोंबा मारल्या की आजच्या स्त्रियांच्या समस्या सुटतील असा यांचा समज असावा बहुतेक. याच्याही पलिकडे जाऊन हे हिंदु धर्माला शिव्या देत देत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचे गोडवेही गाऊ लागले आहेत, आणि ते ही चक्क बाबासाहेबांचे नाव घेवुन . ज्या बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातुन ओरडून ओरडून सांगीतले की "मुसलमानांचे बंधुत्व हे सर्व मनुष्यांकरिता नसुन ते फक्त मुस्लिमांपुरते मर्यादीत आहे. जे मुस्लिम संघाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरीता घृणा व शत्रुता याच्याविना काही नाही" किती विरोधाभास हा ? आंबेडकरांची इतर पुस्तके स्वत:च्या रसभरीत अनुवादासहीत प्रकाशित करुन मोफत वाटणारे त्यांच आंबेडकरांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तका बद्दल ब्र ही काढत नाही याचे कारण काय बरे असावे ? शेवटी केवळ हिंदु द्वेश या एका समिकरणातुन एकत्र आलेले हे अभद्र एकत्रिकरण आता स्वत:मधेच असलेल्या अंतर्गत वादातुन नष्ट होईल यात शंका वाटत नाही.

Thursday, October 4, 2012

श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण

(श्री सुनिल चिंचोळकर यांच्या श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण या पुस्तकाचा सारांश )

जनमानसात संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ-तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत पंचक घर करून बसले आहेत। ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव आणि तुकोबारायांच्या अभांगाच्या गाथा या पाच ग्रंथाना मराठी भाषेचे पाच वेद म्हणून ओळखले जातेय. पाचही ग्रंथात आढळणारी फार मोठे वैचारिक साम्य व एकवाक्यता आहे. त्यातील काही उदा.
१) जग मिथ्या आहे 
२) प्रपंच दु:खमय आहे
३) मन वासनात्मक आहे
४) शरीर मर्त्य आहे
५) वासनेमुळे मनुष्या पुन:पुन्हा जन्माला येतो
६) मोक्ष म्हणजे निर्वासन होऊन पुनर्जन्माच्या चक्रातुन स्वता:ची सुटका करून घेणे
७) त्यासाठी दिर्घकाळ साधना करावी लागेल
८) मनापासून भक्ति केल्यास भगवंताची प्राप्ती होऊन माणूस एकाच जन्मात मुक्त होऊ शकतो
९) मनाने साधना केल्यास भटकंती होऊ शकेल म्हणून सदगुरूची आवश्यकता आहे
१०) मनुष्य मूळता: ब्रम्हस्वरुप आहे 
११) ब्रम्ह अनादी आणि अनंत आहे
१२) एकदम ब्रम्हाची धारणा करता येत नसल्यास ईश्वर ही संकल्पना स्वीकारावी
१३) ईश्वर सगुण आहे आणि ब्रम्हाप्रमाणे निर्गुण देखील आहे
१४) एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात वास करून आहे
१५) कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती एकाच परमात्म्याला प्राप्त होते
१६) विविध साधना पद्धतीमधे भेद किंवा अंतरविरोध नसून ती माणसांच्या स्वभावानुसार केलेली सोय आहे
१७) कर्म, भक्ति ज्ञान आणि योग यापैकी कोणत्याही एका मार्गाने माणूस साधना करून मुक्त होऊ शकतो
१८) मुक्त होण्यासाठी आसक्ती, ममत्व वासना या गोष्टींचा त्याग करावा लागतो
१९) मोक्षासाठी विहित कर्म सोडण्याची गरज नाही.
२०) प्रत्येकाने वर्णव्यवस्थेनुसार आपापले कर्म करावे.
राजवाडेंनी लावून दिलेले भांडण- : १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या ५ संतांचे वारकरी आणि धारकरी किंवा प्रवृत्तीवादी आणि निवृत्तीवादी असे वर्गीकरण कुणीही केलेले नाही। परंतु इतिहासाचार्य राजवाडेनी एक लेख लिहीला व समर्थ रामदास हेच खरे संत आहेत तर 'ज्ञानेश्वर ते तुकाराम' हे वारकरी संत केवळ टाळकुटे होते असा विचार मांडला, वास्तविक पाहाता राजवाडे यांचा हा लेख अतिशय बेजबाबदारपणाचा होता। पण त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रचंड वैचारिक वादळ निर्माण झाले व साहित्यिक क्षेत्रातील वातावरण अंत्यंत दुषित झाले. वारकरी आणि धारकरी असे दोन गट पडले .वारकर्यांनी समर्थाना मग सकल संत गातेतून वगळले. नंतर मग हे दोन गट कसे भिन्न आहेत याचे विपुल लेखन घडले परिणामी त्या दोन गटातील दरी वाढतच गेली. त्याने एवढे विकृत स्वरुप घेतले की समर्थांची ओवी जर उचारली गेली की काही वारकरी मंडळी टाळ खाली ठेवून कीर्तन बंद पाडीत. स्वता: समर्थनी आपल्या संप्रदायला धारकरी असे म्हंटले नाही. रामदास-तुकाराम भेट ही झालेली. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात समर्थ रामदासनी स्थापन केलेला मारुती आज ही उभा असून त्याच्या दगडी भिंतीवर "शरण शरण हनुमंता तुज आलो रामदूता" हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. जर त्यावेळी वारकरीमधे समर्थाना मनाचे स्थान नसले असते तर मग तिथे हनुमान मंदिर त्याना बंधाता आले असते का? रामदास व तुकाराम या संतानी एकमेकांचे प्रशंसा करणारे अभंग लिहिले आहेत। समर्थ रामदासानी इतर ही वारकरी संतांचे गुणगान गायले आहे त्यात अगदी आरत्यांचाही समावेश आहे.
समर्थ रामदास कृत आरती व स्तवन : 
प्रती संत ज्ञानेश्वर- 
कलियुगी त्रसूनी गेले सज्जन भवऊष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृषणे
तोशविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेने निरसुनी गेले अज्ञान 
जयदेव जयदेव जय ज्ञान देवा मंगल आरती करतो दे तव पद ठेवा
दासांचा सारथी म्हणवुनी मी तुजला बाहता दिंडायाला न पावसि का मजला
नुल्लन्घिशी या माते अज्ञविपीन माजला दास म्हणे मम जीव हा तघोंगो बुजला 
प्रती श्री सकल संत - 
निवृत्ती सोपं ज्ञानेश्वर मुक्ताबाई चांगदेव दोघे सुरदास रामदास पाहो 
विमळानाद सुखानंद मिराबाई सद्भव 
धना सेना कबीर प्रमानंद मेहॉ 
पंपदास सज्जन कृष्ण चरचारी 
तुलसी नारा नामा विठा वसुरी 
जासवन्त गांगल पाठक मुदग ल नरहरी 
खेचर जोगा नागा आष्टा बॅहिरो दिंगरी 
अलखीदास झाल्हण मनदास रेणुका नंदन 
कांपर कूर्मडास आणता गोरा धुंदी जनार्दन 
केशवडास चंगा परसोवा नायक पदामण्कको 
सुदामा सवता अच्युत एको जनार्दन्
प्रती तुकाराम- 
धन्य धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दिप लागे धन्य निसपरुहता एकविध निष्ठा 
श्रुतीभाव स्पष्टा दाखविसी संतोषाले चित्त होताची दर्शन 
कॅलो आली खून अवताराची घाटाल्से धडा नामाचा पै गाधा 
प्रेमे केला वेडा पांडुरंग नववीधा भक्ति रढविली जगि तारु कलियुगी दास म्हणे
संत तुकाराम महाराज कृत समर्थ स्तवन - 
का स्ताविशी माते दुर्बळ पतिता नामितो समर्था पाय तुझे ब्रम्हाज्ञ ब्राम्हण वैराग्य पुतळा 
रामभजनी लीला अनुपम्य त्रेतायुगी स्वामिसेवा केली भारी श्री रामावतारी महरुद्रा हे आम्हा कळले स्वामींच्या प्रतापे 
वाडलो पायपे समर्थांच्या असावी ते कृपा समचरणी दृष्टी वितेवरी गोमती वृत्ती राहो भक्तासे दिन स्वामिंची करुण 
विट्ठ्ल किर्तना प्रेमा रहो तुम्हा संताणलागी मगतासे एक तुका म्हणे सुख संतापायी
दोन संत एकमेकांचे द्वेष करीत नाहीत मात्र अनुयायी भांडत असतात दोन साहेब कार्यालयात गप्पा मारीत असतातपण त्यांची कुत्री मात्र एकमेकांवर भूंकत असतात। तस हा प्रकार झाला।
मागे एकदा प पु बाबा महाराज सातारकर म्हणाले होते की -
"मदास की ज्ञानेश्वर ते तुकाराम हा वाद साहित्यिकांमधला आहे. तो सांप्रदायिकांवर लादु नका. कोणत्याही सांप्रदायिक वारकर्‍याने समर्थन नावे ठेवली नाही किंवा समर्थंच्या गडावरील मंडळीनी ज्ञानदेवाना नावे ठेवली नाहीत. जे नावे ठेवणारे आहेत त्याना परमार्थ कळालाच नाही. त्यांचा विचार करण्याचे कारण नाही. तेंव्हा समर्थ व वारकरी सांप्रदायात द्वैत नाहीच."
समाज सुधारकांनी वाढवलेले द्वैत-
महारष्ट्रात वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय आहे संख्येच्या दृष्टीने ही मोठा आहे। या संप्रदायाचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व जतीमधे वारकरी संत होऊन गेले सेना न्हावी, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, नरहरी सोनार, जलोजी आणि तुकोजी पांचाळ हे सुतार, चोखामेळा हरिजन, तुकाराम वाणी तर ज्ञानेश्वर-एकनाथ हे ब्राम्हण. सर्व जातीतील संत असल्यामुळे हा संप्रदाय खेड्या पाड्यात व बहुजन समाजामधे सर्वदूर पोहोचला पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे शक्तीपीठ आणि भक्तीपीठ बनले। अगोदर सांगितलेल्या कारणांमुळे काही वारकरी मंडळीनी समर्थाना न स्वीकारल्याने महारष्ट्रातील संख्येने मोठे असलेल्या भक्तांकडून समर्थ दूर गेले। वारकरी संप्रदायात बहुजन समाज जास्त असल्यामुळे बहुजन समाज आणि समर्थ यांच्यात एक दुरी निर्माण झाली.त्याच वेळी सामाजीक क्षितिजावर तथाकथित समाजसुधारकांचा उदय झाला आणि ही परिस्थिती आणखीच बिघडली. त्यानी संताना अकारण वेठीस धरले; जातीव्यवस्थेचे निर्मूलन करत असताना ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी दुही निर्माण केली आणि त्याचवेळी राज्य करीत असलेले ब्रिटीश मंडळीनी या वादाला खतपाणी घातले.काहीनी तर अगदी मोगल राज्यकर्त्यानी हिंदुंवर केलेल्या अत्याचाराचेही समर्थन केले. इस्लामी राजवटीला विरोध करणारे - छ्त्रपती। शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामीपैकी शिवरायांच्या वाटेला जाणे परवडण्यासारखे नव्हते म्हणून मग राहीले ते समर्थ ते ब्राम्हण।म्हणजे त्यांच्यावर टीका म्हणजे बहुजन समाजास खुश करणे.आणि बनवून टाकले समर्थाना ब्राम्हणांचे पुढारी.
स्वामी विवेकानंद म्हणतात- 
"धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही. कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही. किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना असून त्यांचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।" धार्मिक क्षेत्रात सर्वच संतानी सामाजिक समता प्रस्थापित केली आहे. " हिंदू धर्ममधे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत . " चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश: "याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.आणि भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण- ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।
गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण, व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र् . स्वामी विवेकानंद म्हणतात, "मला अश्या प्रकारची समाजव्यवस्था हवी आहे जिथे शंकराचार्यांचा मेंदु असेल, महंमदाची समता असेल,बुद्दाची करुणा असेल आणि कॄष्णाचे चातुर्य असेल।" संतानी भक्तिच्या क्षेत्रात समता आणण्याचा प्रयत्न केला; समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यानी कधीही बंड पुकारले नाही। हा संतांचा दोष नसुन सामाजिक मानसिकतेचा आहे.स्वामी विवेकानंद केवढे मोठे क्रांतिकारक संत पण ते दक्षिणेश्वराच्या काली मातेच्या मंदिरातील देवीला बोकड बळी देण्याची प्रथा बंद करु शकले नाही किंवा भगिनी निवेदिता यांना ते काली मातेच्या मंदिरात दर्शनाला नेऊ शकले नाही तुकाराम महाराज हे वेद व शास्त्र यांचे कडवे अभिमानी होते। ते म्हणतात-" वेदा निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ १३४५॥ " . प्रत्येक संताला कोणत्या ना कोणत्या जातिच्या माणसांनी त्रास दिला आहे पण संतानी कधी त्याला जातीयतेचा रंग दिला नाही. शिकागो धर्म परिषदेवरुन आल्यावर विवेकानंदाना जगन्नाथपुरीच्या पुजार्याने मंदिर प्रवेश नाकारल्यावर जर त्यांनी लोकाना भडकावुन दिले असते तर आपण विचार ही करु शकत नाही. ते आपल्या गुरुबंधुला लिहिलेल्या पत्रात म्हणतात - "मी जगाकडुन खुप सन्मान स्विकारले आहे आता निंदा देखिल सहन केले पाहिजे" । पंतप्रधाना असतानाच ईंदिरा गांधी याना देखील मंदिर प्रवेश नाकरला गेल्यावर जर त्यानी मनात आणले असते तर त्या पुजार्याला कामावरुन काढुन टाकले असते. पण केवळ सुसंस्कॄतपणा म्हणुन त्यांनी त्या पुजार्याला सोडुन दिले.
रामदास जातीयवादी ??
-समर्थ म्हणतात- "मराठा तितुका मेळवावा" म्हणजे त्याना मराठा समाजबद्दल अभिमान असावा , "भेटो कोणी नर । धेड, महार वा चांभार । जाणावे अंतर । या नाव भजन ॥" म्हणजे त्याना बहुजन समाजाबद्दल ही बराच कळवळा होता. ब्राम्हणाबद्दल, ब्राम्हणांच्या सोवळ्याबद्दल बोलताना ते म्हणतात - "सोवळे कोणते रे । ब्राम्हणा ओवळे कोणते रे ॥" म्हणजे ते पक्के ब्राम्हणद्वेष्टे होते हे सिद्ध होते. पण आजकालचे स्वयंघोषित पुढारी त्याना मात्र ब्राम्हणांचे पुढारी का ठरवू पहात आहेत कोण जाणे ? ज्या प्रमाणे वकिल लोक आपल्या प्रतिस्पर्धिचे कुठले तरी वाक्य आणुन त्याचा मनमानी अर्थ लावुन त्याला नाही नाही ते आरोप चिटकवतात तसे हे कावळ्याची नजर असलेल्या पण साहित्यिकाची आव आणणारया लेखकांनी समर्थांवर आरोप करुन स्वत:ची घाण त्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला आहे. काविळ झालेल्याला जसे सगळिकडे पिवळे दिसत असते तसे त्या लोकांना सतत समर्थ द्वेषच दिसतो॥ शेवटी - "तो काक पक्षी । क्षते परिक्षी । क्षतेच लक्षी" हेच खरे.
समर्थांचे शिष्यगण
यात इतर बहुजन वर्गही जास्त होता - धोंडिबा धनगर, दत्ता न्हावी, बाजी गोसावी, वली महंमद, फाजलखान ई.वली महंमद तर मराठवाड्यातील मठांचा प्रमुख होता. महात्मा गांधी जेंव्हा नेतृत्व करित होते तेंव्हा सर्व प्रांताचे पुढारी हे ब्राम्हण होते पण म्हणुन कांही ते ब्राम्हणांचे पुढारी होवु शकत नाहीत. परवाच वारलेले श्री। नानासाहेब धर्माधिकारी यांचे १ कोटी शिष्य गण आहेत. त्यानी आयुष्यभर दासबोधाचे निरुपण केले. तसेच त्यानी शेकडो निरुपणकार बनवले त्यात अगदि भांडी घासणार्‍या स्त्र्यियांपासुन ते भाजी विकणार्‍या मायेपर्यंत लोक आहेत. मुठभर शिष्यांचे काम बगुन जर समर्थाना दोष देणार असाल तर मग आज महापुरुष म्हणवुन घेतले जाणार्यांचे काय्? त्यांच्या शिष्याने केलेली कु-कर्मे त्यांच्यावर कसे थोपवता येते?
एक घटना -
राज्याभिषेक समयी शिवरायांना २०० हिंदुंचे शुद्धीकरण करायचे होते पण तत्कालीन समाजातील सनातनवाद्यांमुळे ते शक्य झाले नाही पण वैयक्तिक जीवनात त्यानी नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू धर्मात आणले. जर कोणी उद्या उठुन असे म्हणाला की २०० लोकाना शिवरायांनी दिलेल शब्द फिरवला तर ते मुर्खपणाचे ठरेल. छ.शाहुनी मराठा समाजतील शंकराचार्यांचे पीठ ही बनवले व भिक्षुक निर्माण करण्याचा ही प्रयत्न् केला पण खुद्द् मराठा समाजानेच ते नाकारले.. ( पण आज तेच मराठे आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत काय दुर्दैवविलास आहे पहा.)
तुकाराम महाराजांचा खुन होतो ब्राम्हणाकडुन, ते झाकण्यासाठी ते वैकूंठ ला गेले अस अपप्रचार ब्राम्हण करतात असा ही आरोप होतो... तुकाराम महाराजांचा खुन होतो व तेही केवळ १२ मैल दुर असलेल्या पुणे इथे राहणार्या शिवरायाना देखिल कळत नाही जिथे शिवरायांचा साम्राज्य आहे . अशाप्रकारे हे केवळ तुकारामांचाच नव्हे तर छ।शिवरायांचा देखिल अपमान करीत आहेत. अफजलखानचा वकील हा ब्राम्हण होता म्हणुन त्याचा राजकारण करणारे हे मुद्दाम लपवतात की अफजलखानच्या सैन्यात कित्येक मराठी सरदारच नव्हे तर शिवरायांचे नातेवाईक ही होते. एवढेच काय छ्.शंभुराजे औरंगजेब शी लढत असताना शिवरायांचे सहा जावई संभाजी राजांविरुद्द् लढत होते. एका शिखांने इंदिरा गांधींची हत्या केली तर ते विसरले जाते पण एक ब्राम्हणाने म।गांधींची हत्या केली हे मात्र ६० वर्षे झाली तरी विसरले जात नाही। मतांसाठी शिखांची माफी मागितल जात पण ब्राम्हणाना झोडपल जात।
शिव-समर्थ पत्रे -
दोन्ही महापुरुषांनी एकमेकास लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.
१) १६४९ ला समर्थांनी शिवरायांस लेहिलेल पत्र
2) १५ ओक्टोबर १६७८ ला शिवरायानी समर्थास लिहिलेल पत्र ( चाफळ ची सनद )
३) १६८१ शिवरायांच्या अकाली निधनानंतर संभाजीना लिहिलेल पत्र
४) १३ जानेवारी १६८२ ला संभाजी राजाना केलेला उपदेश.
इतकेच काय शहाजी राजे व समर्थांचा भेटीचा कागद आजही तंजावर येथिल मराठी ग्रंथालयात 'भोसले रुमाल' या बाडात उपलब्ध आहे.
शिव-समर्थ भेट -
पहिली भेट चाफळ पासुन २ मैल अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे झाली. ( सन १६४९ ,१२ एप्रिल) दुसरी भेट शिवथर घळ इथे १६७६ साली. शिवरायांच्या चरित्रात तुकाराम महाराजांचा जास्त उल्लेख येत नाही याचे कारण तुकाराम महाराज जेंव्हा वैकुंठला गेले त्यावेळी शिवराय हे केवळ १९ वर्षाचे होते. या उलट समर्थ हे महाराजांच्या निर्वाणानंतर दोन वर्षानी समाधिस्त झाले त्यामुळे संपुर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले. बाबा महाराज सातारकर म्हणतात की - "तुकाराम व समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते हे कोणीही नाकारु शकत नाहीत"
शिवराज्याभिषेक व समर्थांची अनुपस्थिती-
अनेकदा शत्रु गंमत पाहण्यासाठी व फोडझोड करण्यासाठी उपस्थित असतात. राज्याभिषेकाला इंग्रज अधिकारी देखिल आले होते ते काय फार प्रेमाने नव्हे. तो राजनितीचा एक भाग असतो. म्हणुन मग काय समर्थ व शिवराय यांची भेटच् झाली नाही असे म्हणणे कितपत बरोबर हे तुम्हीच ठरवा. प्रभु रामचंद्राच्या जडणघडणित विश्वमित्रांचे स्थान अबाधित आहे पण राम-राज्याभिषेकावेळी ते कुठे उपस्थित होते? मग असे म्हणणार का त्यांची भेटच झाली नाही?
सांप्रदायिक चरित्रकारांच्या चुका -
राजा पेक्षा प्रजा अधिक राजनिष्ट म्हंटल्या प्रमाणे समर्थांनी कधिही स्वत:कडे स्वराज्य स्थापनेचे श्रेय घेतले नाही. पण काही शिष्यानी हे तत्त्व न पाळुन समर्थाना श्रेय तर शिवरायाना केवळ आज्ञाधारक बनवुन टाकले. हिंदवी स्वराज्य़ स्थापनेची प्रेरणा मातोश्री जिजाबाईंची तर सर्व मेहनत शिवरायांची होती यात काही वादच नाही. एकाद्या आमदाराचे किंवा एकाद्या खासदाराचे निर्णय हे जसे पुर्ण पक्षाचे होवु शकत नाही किंवाएकाद्या स्वय़ंसेवकाचे निर्णय जसे संपुर्ण संघाचे निर्णय होत नाही तसेच एका शिष्याचे चुक ही संपुर्ण संप्रदायची होवु शकत नाही. राजकारणात खर्‍या राजकारणाचे कागदपत्र उपलब्ध नसतात. जे उपलब्ध असतात ते राजकारण नसतात तर ते प्रशासनाचे भाग असतात. "राजकारण बहुत करावे । परंतु कळोचि न द्यावे ।"
अफजल खानाच्या आगमनाची गुप्त सुचना देणारे पत्र-
विवेके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणून
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोचिं नये॥१
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या अंगी
रघुवीरकृपा ते प्रसंगी
दासामहात्म्य वाढवी॥२
रजनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार
घालिताती येरझार।लाविले भ्रमण जगदीशे॥३
आदिमाया मूळ भवानी।
हेचि जगाची स्वामिनी।

येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥४॥ 
विजापुरचा सरदार निघाला आहे.

असा स्पष्ट संदेश त्यात मुद्रीत झालेला दिसतो. खान निघाल्याची खबर देणार पत्र
डेमिंग या इंग्रज इतिहासकाराचे एक प्रसिद्द वाक्य आहे - " Shivaji and Ramdas were two bodies but one soul"
अन्य कांही आक्षेपांचे खंडन -
१) लग्न मंडपातुन पळुन गेल्या मुळे एका स्त्री वर अन्याय
- त्या स्त्रिचे त्याच लग्न मंडपात दुसर्या मुलाशी लग्न लावुन देण्यात आले। त्यामुळे त्या स्त्री वर अन्याय झाला असे म्हणालात तर ते कसे खरे मानायचे? २) तुकारामानी "भिक्षापात्र अवलंबविणे । जळो जिणे लाजिरवाणे" असे म्हणाले व समर्थ संप्रदाय हा भिक्षेवर अवलंबुन आहे त्यामुळे ते ( तुकाराम ) समर्थविरोधी होते
- पण स्वता: तुकाराम महाराजच काय आज देखील वारकरी मंडळी पंढरपुर ला वारीला जात असताना भिक्षेचा आश्रय घेत असतात ३) समर्थानी जे लिखाण केले ते कारकुनी होते 
- समर्थ हे साहित्यिक होते असे प्रशस्तीपत्रक कुणा लुंग्यासुंग्या कडुन घेण्याची काहिही गरज नाहीये। नराधमांचे विद्रोही साहित्य संमेलन- नावालाच विद्रोही पण काम मात्र हे संत व देशद्रोही करत आहेत। समर्थ रामदासच नव्हे तर संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्यावरही हे विद्रोही घसरले। स्वामी विवेकानंद म्हणतात - " द्वेषावर आधारेत कार्य जास्त दिवस टिकत नाही।"
आता गाडी इतरांवरही -
इतके दिवस रामदासांवर बोंबलत असलेली मंडळी आता हळुह्ळु ज्ञानदेवांवर घसरत आहेत। जाहीर सभेंमधुन ते सांगत आहेत की, - ग्यानबा-तुकाराम म्हणण्या ऐवजी नामदेव-तुकाराम म्हणा 
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
तर- झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे
- तर लोकमान्य टिळकांना या लोकांनी ' भटमान्य' असे म्हंटले आहे
इतिहासाच्या अभ्यासाला जातियवादाचे ग्रहण - 
आजचे हे तथाकथित इतिहासकार फक्त जातिवरुनच इतिहासाचे एकांगी लिखाण करित आहेत। त्यातुन मुर्ख सरकार असले कि झाले वाट लागणारच या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे या वादातुनच मग दादोजी कोंडदेव पुरस्कार वाद तर कधी सरस्वतीपुजन वरुन वाद होतात ।
समर्थांच्या चारित्र्याची चर्चा - 
नागपुरच्या माकडाने मर्कटश्री मा म देशमुख समर्थांसारख्या महापुरुषाच्या चारित्र्यावर शितोंडे उडवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 'अध्यात्मात वस्त्र् देणे' हा वाक्य प्रचार आहे हे या मुर्खाना कधी कळणार? सुफी संप्रदायात देखिल स्त्रियांचे वस्त्र अंगावर परिधान करुन देहबुध्दि संपल्याचे दाखविण्याचे एक संकेत आहे. या मुर्ख विद्रोहीनी गिरिधर स्वामींची मुळ ओळी न देता एका ओळिचा आपल्याला हवे तसे अर्थे घेवुन दळभद्री आरोप समर्थांवर करावे या सारखा विनोद शोधुनही सापडणार नाही. शेवटी काय मनी वसे ( विद्रोहींच्या ) ते स्वप्नी ( मुखी) दिसे एकाद्या ग्रंथातील शेकडो प्रतिकुल संदर्भ सोडायचे व एकाद्या प्रसंगाचा मनमानी अर्थे लावयचा व वर इतिहास संशोधकाचा आव आणयचा हे म्हणजे - शेळीने वाघाची कातडी पांघरुन स्वता:ला वाघ म्हणून घेण्यासारखे आहे. न र फाटक यांचे एक वाक्य घेवुन वाद माजविणारे त्यांनी समर्थांचा शेकडो वेळा केलेले कौतुक मात्र लपवायचे असे का? शेवटी काय या मुर्खांकडुन समर्थांसाठी प्रशस्तिपत्रक घेणे म्हणजे एकाद्या वारंगनेकडुन प्रतिव्रतेने प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होइल किंवा गटारीकडुन गंगा पवित्र असल्याचा प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होय.
शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडे दुष्काळ.
डॉ.हेडगेवार सरसंघसंचालक असताना संघाच्या शाखेंवर प्रार्थना संपली म्हणजे "राष्ट्रगुरु स्वामी रामदास की जय" असे म्हणण्याची पद्दत होती शेवटी समर्थांचा शिवरायांवर केलेला काव्य देत आहे. जे फ़क्त मराठी मनात च नव्हे तर सर्व शिवभक्ताना प्रिय आहे -
" निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितिचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ "
" शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा साक्षेप ॥
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी 
त्याहुन करावे विशेष । तरिच म्हणावे पुरुष
या उपरी आता विशेष । काय सांगावे? ॥ "
मला वाटते वरील माहिती वाचल्यावर एकादा अभ्यासु माणुस नक्किच विचार करेल व खरे-खोटे काय ते जाणून घेईल.
-सुनिल चिंचोळकर (’समर्थचरित्र : आक्षेप व खंडण’ या पुस्तकाचा संक्षेप)

Saturday, September 15, 2012

शिवराय विरुद्ध ब्राम्हण


सध्या महाराष्ट्रात एखाद्या जातिच्या लोकांना आरोपीच्या पिंजर्‍या मध्ये उभे करुन स्वत:ला मोठे शाहणे म्हणुन फुशारक्या मारण्याची पद्धत चालू झाली आहे आणि स्वत:ला दुसर्‍यापेक्षा शाहणे आणि विद्वान सिद्ध करायचे असेल तर समोरच्याचे विद्वत्त कमी आहे किंवा समोरचा आरोपाने बरबटलेला आहे असे दाखवले की काम संपते, त्याची विद्वत्ता सिद्ध होते, साधारण अशा भ्रमामध्ये काहि मंडळी आहेत आनि या भ्रमातुनच त्यांनी अज ब्राम्हण समाजाला शिवरायांच्या विरुद्ध उभे केले आहे. एकिकडे सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करुन मुसलमानांना जवळ करायचे आणि दुसरीकडे जातीच्या आधारावर ब्राम्हणांना शिवरायांचे ’खरे’ शत्रू म्हणुन लोकांसमोर उभे करायचे. एकिकडे शिवरायांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही धर्माचा अथवा धार्मीक स्थळाचा अपमान केला नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे शिवरायांनी कृश्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला म्हणुन मंदिरे पाडायची आणि वेदांवर घाण करण्याची भाशा करायची हा स्वत:ला विद्रोही म्हणवणार्‍या लोकांचा दुटप्पीपणा आमच्याच लोकांच्या लक्षात येत नाही हे आमचेच दुर्दैव म्हणायचे.

शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण होते : या वाक्याचे भांडवल करुन संपुर्ण ब्राम्हण समाजाला टार्गेट करुन ब्राम्हण हे शिवरायांच्या विरुद्ध होते असे दाखवले जाते परंतु असा प्रतिवाद करणार्‍याला शिवरायांचा राज्याभिशेक करणारी व्यक्तीही एक ब्राम्हणच होती हे का दिसत नाही मला कळत नाही. (गागाभट्टांवरील आक्षेपांचे खंडन मी मागे या लेखामध्ये  केलेलेच आहे) . शिवराज्याभिशेकाला विरोध करणारे जर ब्राम्हण होते तर शिवरायांनी नेमलेले जे अष्टप्रधान मंडळ होते त्यात बहुतांशी ब्राम्हण होते हे विरोध करणारे का विसरतात ? सभासद बखरी मध्ये शिवरायांच्या राज्याभिशेकाला पन्नास हजार ब्राम्हण उपस्थित होते असा उल्लेख आहे त्याच्याकडे का डोळेझाक केली जाते ?? शिवरायांच्या राज्याभिशेकाला ज्यांनी विरोध केला ते मुर्ख होते म्हणुन का ते ज्या जातिमध्ये होते त्याच जातीच्या बहुतांशी लोकांनी शिवरायांच्या राज्याभिशेकाला मान्यता नव्हे स्वत: अभिशेक केला इतकेच नाही तर बहुसंखेने राज्याभिशेकाला उपस्थित राहुन अनुमती दर्शवली त्याचे काय ??

जेम्स लेन च्या मार्फत ब्राम्हणांनी शिवरायांची बदनामी केली :- याप्रकरणी प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉग वरुन (श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून घेतलेला लेख देत आहे तो वाचुन वाचकांनी स्वत:च आपले मत ठरवावे ...
छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......

जयसिंग जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण  :-  बर्‍याचवेळी मिर्झा राजा जयसींगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी  जयसिंग यांच्या यशासाठी आणि पर्यायाने शिवरायांच्या विरोधात यज्ञ वगैरे केले म्हणुन ब्राम्हणांना वेठीस धरले जाते. यज्ञ , पुजापाठ ,हवन  वगैरे पौरोहित्य करणे त्या काळी ब्राम्हणांच्या उपजिविकेचे साधन होते. त्या वेळी ब्राम्हणांनि जे यज्ञ वगैरे केले ते जयसिंगाच्या सांगण्यावरुन . म्हणजे ब्राम्हण हे फक्त पौरोहित्य करत होते आणि अधिपत्य जयसिंग करत होता. का करत होता आणि कशासाठी करत होता याच्याशी काय देणे घेणे ? जयसिंगाच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनी पैरोहित्य केले यावरुन जर ब्राम्हणांना वेठिस धराचे असे असेल तर. जयसिंगासाठी ज्यांनी ज्यांनी तलवारी वगैरे बनवल्या अशा सर्व लोहारांना, त्याचे केस कापुन सेवा करणार्‍या सर्व नाव्ह्यांना, त्याचे कपडे बनवणार्‍या सर्व शिंपी जातीच्या लोकांना अशाप्रकारे स्वत:ची उपजिविका चालवण्यासाठी जयसिंगाच्या हाताखाली जे जे मराठे आणि इतर जातिचे लोक काम करत होते अशा सर्वांना दोश द्यावा लागेल. ब्राम्हणांना यज्ञ केला म्हणुन दोष लावनारे होतील का तयार ??

जरा इकडे ही लक्श द्या  :- केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राम्हण समाजाला टार्गेट केले जाते . असे असेल तर शिवरायांना काय केवळ काही ब्राम्हणांनी विरोध केला ??शिवाजी महाराजानी जे स्वराज्य उभारले त्याला उभ्या महाराष्ट्रातून पाठिंबा होता अशी एकच बाजू नेहमी फोकस केली जाते. अन हल्ली ब्रिगेडवाले ब्राह्मणांचा शिवाजीना विरोध होता हे ठासून सांगताना काही नावं जाणीवपुर्वक घेत नाही. सध्या खालील नावं वाचा विरोधक कोण होते ते जाणून घ्या. (खालील यादी संजय सोनावणी यांच्या ब्लॉग वरुन घेतलेली आहे).
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ सावंतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव....

आता शिवरायांच्या मुस्लीम विरोधकांची यादी बघू.
१. वाईचा सुभेदार अमीन
२. फतेह खान
३. फतेह खानाचा पठाण सरदार मुसेखान
४. शाहिस्तेखान ( त्याच्या लाखांच्या सेनेत किती मुस्लीम होते ते कोणीच सांगू शकत नाही.)
५. अफझल खान
६. सय्यद बंडा
७. अफझल खानाचा मुलगा फाजल खान
८. अफझल खानाचे सरदार
मुसेखान ( २रा)
याकूत
हसन
अन्कुशखान
रनदुल्ला खान
अंबरखान
९. सिद्धी जोहर
१०. सिद्धी मसूद
११. दिलेर खान
१२. सर्जा खान
१३. बहलोल खान
१४. रोहुल्ला खान
१५. जंजी-याचे सिद्धी
१६. सुरतेच्या छाप्याच्या वेळी शिवरायांवर वकिलाच्या वेशातून वर करणारा मुस्लिमच होता.
१७. याशिवाय औरंगजेब व त्याचा वजीर, दोन्ही आदिलशाह आणि त्यांचे वजीर, बडी बेगम.
या शिवाय संभाजी महाराजांना पकडून विदुषकाचा वेश घालून त्यांची धिनढ काढली तेव्हा त्यांच्यावर दगड मारणारी मुस्लीम प्रजा धरली तर हि संख्या आणखी वाढेल.

आता काही ब्राम्हणांची नावे पुढे करुन आकांडतांडव करणारे काय बोलणार आहेत  ?  केवळ काही ब्राम्हण शिवरायांच्या विरोधात गेले म्हणुन ब्राम्हणांना टार्गेट केले जात असेल तर शिवराज्याभिषेक करणारे, दिलेरखानाशी दिलेरीने लढुन प्राण त्यागणारे, शंभुराजांना स्वराज्यात सुखरुप आणणारे, भीषण मृत्युतही त्यांची साथ न सोडणारे, राजांच्या सुखरुप सुटकेसाठी छातीचा कोट करुन खिँड लढवणारे, राजांना दरोडेखोर म्हणणाऱ्‍यांना इतिहासाचे संशोधन करुन त्यांचे जीवन चरित्र सर्वाँसमोर आणणारे सर्वजण ब्राह्मणच. त्यांचे काय करायचे? चांगले वाईट लोक सर्व जाती धर्मा मधे आहेत, पण ही गोष्ट समजण्या इतकी अक्कल ज्या लोकांत नाही त्यांना अत्न्यानी बालक समजून दुर्लक्ष करावे, कारण पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था या लोकांची आहे.