Friday, January 15, 2010

विद्रोही संघटना व वास्तव

सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. "आरोप" हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन ’संडासविर’ आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचाच विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी संघटनांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे ’बडे’ नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या ’बड्या’ नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखि प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी पतिकूल परिस्थितित सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात ’बामसेफ’ हीम संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला ’मराठा महासंघ’ या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या ’शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म’ या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. "अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी ’आदिवासी हिंदु नाहीत’ अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने ’मराठा जोडो’ यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले."
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या ’हिंदुजागृती’ या पुस्तकात म्हणतात , ".....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा ’समाजाचे संघटन’ या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय."
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, "ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते." तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, "शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ "

आर्यांनी भारतातील मूळ निवासितांना युद्धात पराजीत करुन दास अथवा दस्यु बनवले

इंग्रजांद्वारा आपल्या राजैतिक उद्देशांची पूर्तीसाठी ’फोडा आणि राज्य करा’ या नितीनुसार पसरवलेल्या अनेक वावड्यांमध्ये ही सुधा एक आहे. सर्वप्रथम हा विचार कॅंब्रिज हिस्टरी ऑफ इंडीया’ मध्ये प्रतिपादन करण्यात आला की आर्य लोक विदेशातून येवून भारतावर आक्रमण करुन येथील मूळ निवासी द्रविड, कोळ, भील्ल, संथाळ इत्यादी ना आपल्या शक्तिच्या जोरावर पराजीत करुन त्यांना आपले दास बनवले.
आर्यांकडून बाहेरुन येवून स्थानीक जातिंना जिंकून घेण्याचा प्रश्न भारतातील प्रसिद्ध विधिवेत्ता डॉ. अंबेडकर यांनी , ऋग्वेद मध्ये ’दास’ आणि दस्यु ना आर्यांचे शत्रू सांगीतलेले आहे आणि त्यांना नष्ट करण्याची प्रार्थना सुद्धा केलेली आहे. परंतु यातून भारतामध्ये आर्यांच्या आक्रमणाच्या संदर्भात निर्णय घेतला जावु शकत नाही. त्यांनी ऋग्वेदाच्या आधारावर पुढील तीन तर्क केले आहेत.
१) ऋग्वेदामध्ये आर्य आणि दास अथवा दस्यु यांच्यातील युद्धाचा संदर्भ मिळत नाही. ऋग्वेदामध्ये ३३ स्थानांवर ’युद्ध’ हा शब्द आलेला आहे. ज्यामध्ये केवळ आठ मध्ये त्याचा प्रयोग ’दस्यु’ च्य विरोधी अर्थामध्ये अलेला आहे व ते सुद्धा दोघांमध्ये एखाद्या मोठ्या युद्धाला नाही, तर लहान-सहान लढाया दर्शवतो. ज्यांच्य आधारावर अर्यांचा विजय प्रमणीत केला जाऊ शकत नाही.
२) दास आणि आर्यांमध्ये किरकोळ संघर्ष होता, व तो सुद्धा दोघांच्या सहमतीने शांतिपूर्ण रित्या निश्चित केलेला होता. ऋग्वेद (६.३३.३, ७.८३.१, ८.५१.९, १०.१०२.३) मधुन हे सुद्धा स्पष्ट होते की दास व आर्य्यांचा एकच शत्रू होता आणि दोघांनी मिळून आपल्या शत्रूविरुद्ध युद्धात सहभाग घेतला.
३) संघर्षाचे कारण जातीय नव्हता...तर उपासना भेद होता. स्वत: ऋग्वेद मधुनच हे स्पष्ट होते की हा संघर्ष उपासनाभेद असल्याने उत्पन्न झाला, जाति च्या भेदाचे कारण नाही कारण, ऋग्वेद (१.५१.८, १.३२.४, ४.४१.२, ६.१४.३) यावरुन कळते की आर्य आणि दस्यु यांच्यातील उपासना संदर्भातील आचारविचार भिन्न होते.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी ऋग्वेद (१०.२२.८) या विषेश महत्व दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे.- "अम्ही दस्यु लोकाअंमध्ह्येच राहतो. ते ना यज्ञ करतात ना कशावर विश्वास ठेवत, त्यांचे रितिरिवाज व परंपरा वेगळ्या आहेत, ते माणुस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. ते शत्रू आहेत. त्यांचा नाश केला पाहीजे."
आंबेडकरांचे असे म्हणने आहे की अश मंत्रांसमोर दासांना आर्यांद्वारा विभाजित करणार्‍या सिद्धांतला कोणत्याही प्रकारे मानला जाऊ शकत नाही. आपल्या मताच्या पृष्ठी साठी बबासहेबांनी पी.टी. अयंगर यांच्या लेखाचे उदाहरण दिले आहे.
"मंत्रांच्या परिक्षणातून हे जाणवते की त्यामध्ये जे आर्य, दास अथवा दस्यु हे शब्द आलेले आहेत, ते जातिसूचक नाहीत. तथापी त्यामध्ये अस्था व उपासनेचा बोध होतो. हे शब्द मुख्यता ऋग्वेद-संहितेमध्ये आलेले आहेत.... यांद्वारा असे कधीही प्रमाणित होऊ शकत नाही की ज्या जाती आपल्याला आर्य म्हणवून घेतात ते आक्रमक होते व त्यांनी या देशाला पराजीत करून येथील लोकांचा नाश केला..."
दास अथवा दस्यु कोण होते ? या संदर्भात कुल्लूक नावाचे एक विद्वान आपल्या मनुस्मृती च्या टीके मध्ये लिहिले आहे,- "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या जातिंमध्ये, जो क्रियाहिनतेमुळे जातिच्चुत झाले आहेत, ते भलेही म्लेंच्छभाषी असोत अथवा आर्यभाषी.. सर्व ’दस्यु’ म्हनवले जातात."
ऋग्वेदातील एक मंत्र म्हणतो..
अकर्मादस्यु: अमिनो अमन्तु अन्यव्रति अमानुष: ।
त्वं तस्य अभिन्न हन वधोदासस्य दम्भये ॥
कर्महीण, मनहीन, विरुद्धव्रती अणि मणुष्यताहीन व्यक्ती ला ’दस्यु’ सांगितले आहे व त्याचा वध करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि ’दास’ वा ’दस्यु’ ला अभिन्नार्थी सांगितले आहे. जर ’दस्यु’चा अर्थ आजच्या सारखा दास अथवा सेवक असा घेतला गेला असता तर अशी आज्ञा दिली गेली नसती !
ऎतरेय ब्राम्हण मध्ये एकेठीकाणी म्हटले आहे,- "तुमचे वंश नष्ट होवोत. ही (भ्रष्ट अथवा संस्कार विरहीत) आंध्र, पुंड्र, शवर इत्यादी उत्तर दिक वासींच्या जाती अहेत." दुसर्‍या शब्दात सभ्यता आणि संस्कार विरहीत लोकांचू वंश-परंपरा चालली आणि स्वत: वेग-वेगळ्या जाती बनुन गेल्या. यांना कोणी बनवले अथवा उत्पन्न केलेले नाही. श्री रामदास गौड यांच्या ’हिंदुत्व’ वर पान ७७२ दिलेल्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की दस्यु अथवा दास कसे निर्माण झाले. आता आर्यांद्वारा भारतातील मूळ निवासियांना पराभूत करुन त्यांना दास बनवल्याच्या वावड्यात अधीक दम राहीलेला नाही.

भारताचे मुळ निवासी द्रविड
इंग्रज भारतात येण्यापूर्वी कोण मानत नव्हतेकी आर्य व द्रविड दोन वेगवेगळ्या जाती आहेत. हि गोष्ट इंग्रज भारतात आल्यावरच पुढे ठेवण्यात आली. इंग्रजांना सुद्धा हि गोष्ट यासाठी सांगावी लागली की त्यांनी आर्यांना भारतामध्ये आक्रमक बनवून आनले होते. म्हणजे इंग्रजांनी आक्रमक म्हणुन आर्यांना पुधे केले .. आता आक्रमण कोणावर केले यासाठी सुद्धा कोणीतरी हवे यासाठी व याच उद्देशाने ’द्रविड’ ही संकल्पणा उदयास आली. नाहीतर भारतामधील कोणत्याही साहित्यीक, धार्मिक अथवा अन्य प्रकारच्या ग्रंथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख सापडत नाही की द्रविड वा आर्य कोणा बाहेरच्या देशातून आले होते. आता जरी असे मानुन चालले की अर्यांनी बाहेरून येवून या देशावर आक्रमण केले व मूल निवासितांना युद्धात पराजित केले.. तर हे सुद्धा सांगता आले पाहीजे की त्या मूळ निवासितांच्या काळात या देशाचे नाव काय होते ? कारण जी व्यक्ति जेथे राहते, तई त्या ठीकानाचे नाव ठेवतेच. तर कोणत्याही प्राचिन भारतिय ग्रंथ अथवा तथाकथीत मूळ निवासिंची एखादी परंपरा अथवा मान्यतेमध्ये अशा कोणत्याही नावाचा उल्लेख सापडत नाही.
’संस्कृती के चार अध्ययन’ या ग्रंथात पान क्र. २५ वर श्री. रामधारी सिंह ’दिनकर’ यांचे म्हणने आहे की ’जाति’ अथवा रेस(Race) चा सिद्धांत भारतात इंग्रज आल्यावर प्रचलित झाला, याच्या पूर्वी या गोष्टीला कोणताही आधार नाही की आर्य व द्रविड जातिचे लोक एकमेकाला विजातिय मानत होते.
वस्तुत: द्रविड आर्यांचेच वंशज आहेत. मैथिल, गौड, कान्यकुंबज इत्यादिंप्रमाणे द्रविड हा शब्द सुद्धा भौगोलिक अर्थ सांगणारा आहे. आणि विषेश गोष्ट म्हणजे आर्यांना बाहेरून येणारे असे संबोधनार्‍यांमध्ये मि.म्यूर... जे आग्रभागी होते, त्यांना सुद्धा शेवटी स्विकारावे लागले की, "कोणत्याही प्राचिन पुस्तक अथवा प्राचिन गाथा इत्यादिंतून ही गोष्ट सिद्ध केली जावू शकत नही की आर्य एखाद्या दुसर्‍या देशातून भारतात आले" (म्यूर संस्कृती टेक्स्ट बुक, भाग-२, पृष्ठ ५२३)
याच संदर्भात थॉमस ब्युरो नावाचा पुराणतत्ववेत्ताचे ’ क्लरानडन प्रेस, ऑक्सफोर्ड द्वारा प्रकाशीत व ए.एल. भाषम द्वारा संपादीत ’कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशीत ’दि अर्ली आअर्यन्स’ मध्ये म्हटले आहे,--" आर्यांच्या भारतावरील आक्रमणाचा उल्लेख ना इतिहासामध्ये मिळतो, ना त्याला पुरातात्विक आधारांवर सिद्ध केले जावू शकते." (आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-१२६).
याच संदर्भात रोमिला थापर यांचे कथन सुद्धा उल्लेखनिय आहे, " आर्यांच्या संदर्भात आमचे विचार भलेही अनेक असोत, पुरातात्विक साक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरील कोनत्याही अशाप्रकारच्या कोनत्याही संकेत मिळत नाही....गंगेची उपत्यका चे पुरातात्विक साक्षांमधून हे प्रकट होत नाही की येथे मुळ निवासितांना पळून जावे लागले अथवा पराजित व्हावे लागले.".(आर्योंका आदी देश और उनकी सभ्यता, पान-११३).
इंग्रजांनी या गोष्टीला बराच जोर देवून पसरवले की ’आक्रमक आर्यांनी’ द्रविड पूर्वजांवर अत्याचार केले होते. पाश्चात्य विद्वानांनी द्रविडीयनांची सभ्यता आर्यांच्या सभ्यतेपेक्षा वेगळी आहे हे दाखावण्यासाठी ’हडप्पा कालीन सभ्यता’ हे एक सशक्त हत्यार मिळाले. प्रथम तर यांनी हडप्पाकालीन सभ्यतेला द्रविडी सभ्यता म्हणुन सांगण्यास सुरवात केली परंतु जेव्हा वेगवेगळ्या विद्वानांच्या नवनवीन शोधांमुळे त्यांचे हे कथन असत्य ठरू लागले तेव्हा हे म्हणु लागले की हडप्पा लोक वर्तमान द्रविड नव्हते तर ते भूमध्य सागरीय द्रविड होते, (थोडक्यात को कोणीही होते परंतू आर्य नव्हते). याप्रकारच्या वावड्या मुद्दाम उठवल्या गेल्या. खरे तर सत्य हे आहे की हडप्पा सभ्यता सुद्धा आर्य सभ्यतेचाच एक अंश होती व आर्य सभ्यता वस्तुत: हडप्पा सभ्यतेपेक्षा हजारो वर्ष जुणी आहे.
यातुन हेच सिद्ध होते की आर्य व द्रविद वेगवेगळे नव्हते . जर वेगळे नव्हतेच तर हे म्हणने चूकीचे ठरते की, "भारतातील मुळ निवासी आर्य नव्हे तर द्रविड होते" . आता वेळ आलेली आहे की आर्यांचे आक्रमण व आर्य-द्रविड भिन्नता माणनार्‍या या विचारप्रवाहाला नव्या पुरातत्विक शोधांच्या आधारावर मात्र राजनितिक ’मिथक’ माणुन नष्ट केले जावे.

:दास अथवा दस्युंना आर्यांनी अनार्य बनवून शूद्र वर्गात ढकलले :
सभारतीय समाजाला जाति, मत, क्षेत्र, भाषा ईत्यादींच्या आधारावर वाटून त्याची एकात्मता नष्ट करण्यासाठी इंग्रजी सत्तेने या वावड्या पसरवल्या की आर्यांनी बाहेरून येवून येथे पुर्वीपासून स्थित जातिंना युद्धात पराजीत करुन आपले दास अथवा दस्यु बनवले व नंतर आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचा समावेष करून घेवून त्यांना शुद्र श्रेणी मध्ये ढकलले. या संदर्भात अनेक प्रश्न उठतात, काय दास अथवा दस्यु खरेच आर्येत्तर जाती होत्या ? जर नाही तर त्यांना आर्येतर घोषीत करण्यामागे उद्देश काय असावा ? आणि या शुद्र श्रेणी भारतीय समाजामध्ये त्या वेळी घृणित अथवा अस्पृष्य माणली जात होती ? या प्रश्नांवर क्रमा-क्रमाणे प्रकाश टाकू...!
काय दास अथवा दस्यु आर्येतर जाती होत्या ? : दास अथवा दस्यु आर्येत्तर जाती होत्या अथवा नाही, हे ठरवण्यासाठी प्रथम अपल्याला हे पाहीले पाहीजे की आर्य वांड्मयामध्ये सर्वात प्राचिन ग्रंथ ऋग्वेद चे मंत्र संख्या १.५.१९ ताचप्रमाणॆ ९.४१.२ मध्ये दास अथवा दस्यु शब्दांचा प्रयोग ’अयाज्ञिक’ व ’अव्रते’ यांसाठी आहे व १.५१.८ मध्ये याचा प्रयोग चोर, डाकू अथवा धार्मिक क्रियांचा नाश करणारे असा केला गेला आहे. मनुस्मृति च्या १०.४ मध्ये बंबोज इत्यादी जातिंना पतित होणार्‍या लोकांना दास/दस्यु म्हटले गेले आहे. महाभारताच्या भिष्म पर्वा मध्ये निष्क्रिय व्यक्तिंना दास म्हटले आहे. आता स्पष्टच आहे की या शब्दचा प्रयोग प्रत्येक ठीकाणि एकाद्या विषिष्ठ प्रकारच्या लोकांसाठी वापरलेला आहे ना की एखाद्या जातीसाठी.
यांना अनार्य बनवन्यामागे काय उद्देश्य होता ? : आर्य साहित्यामध्ये ठीक-ठिकाणी अनार्य शब्दाचा प्रयोग मिळतो, वाल्मिकी रामायण मध्ये २.१८.३१. मध्ये दशरथाची पत्नी कैकेई साठी ’अनार्या’ शब्दाचा प्रयोग केलेला आहे. श्रीभग्वद्गिता मध्ये "अनार्याजुष्टमस्वग्यर्मकीर्तिकरमर्जुन" च्या माध्यमातून ’अकिर्तिकर’ कार्यांसाठी ’अनार्युजष्ट’ सारख्या शब्दांचा वापर पहायला मिलतो. ऋग्वेद चे मंत्र ७.६.३ नुसार अव्रतिय, दांभिक, अपूज्य आणि दुषीत भाषेचा प्रयोग करनारे लोक यांसाठी ’मृघ्रवाच’ शब्दाचा वापर मिळतो. अर्थात कोणत्याही आर्य ग्रंथामध्ये ’अनार्य’ शब्द जातीवाचक स्वरूपात प्रयुक्त केला गेलेला नाही. हे स्पष्ट आहे की ऋग्वेद इतादी मध्ये ठिक-ठिकाणी अनार्य, दस्यु, कृष्णगर्भा, मृघवाच इत्यादी शब्द आर्यांपासून वेगळ्या जातिंसाठी योजलेला नसुन आर्य कामांपासुन (सभ्य कामांपासुन) वेगळे अशा लोकांसाठी योजलेला आहे त्याचप्रमाणे ’अनार्य’ हा शब्द ईतर शब्दांप्रमाणे जातिवाचक स्वरुपात योजला गेलेला नाही.

:काय शुद्रजाती भारतीय समाजाय त्या काळी घृणित अथवा अस्पृश्य मानली जात होती ?:
प्राचिन काळी भारतीय समाजात चार वर्ण होते,- ब्रम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र परस्पर सहयोगी होते, एक वर्ण दुसर्‍या वर्णामध्ये जाऊ शकत होता.त्या वेळी वर्ण नव्हे तर त्याची उपयोगीता कर्माच्या प्रामुख्यतेनुसार होते. भारताच्या कोणत्याही प्राचिन ग्रंथामध्ये कोठेही अशा उल्लेख मिळत नाही की जेथे असे सांगितले गेले आहे की शूद्र घृणित अथवा अस्पृष्य आहे अथवा ईतर वर्णांपेक्षा लहाण आहे !
चार वर्णांना समाजरूपी शरीराचे चार प्रमुख भाग मानले आहे. जसे ब्रम्हण - शिर, क्षत्रीय- बाहु, वैश्य-उदर आणि शुद्र-चरण. चारी वर्णांना समान पद्धतीने आपली-आपली उपयोगितेच्या पद्धतीने शुद्रांची उपयोगीता समाजासाठी सर्वाधीक राहीलेली आहे. समाजरुपी शरीराला चालवण्यासाठी, त्याला गतिमान करण्यासाठी आणि सर्व व्यवहार संपन्न करण्याचा भार वाहण्याचे काम पायांचे असते. भारतीय समाजात शूद्रांबरोबर स्पर्षास्पर्ष अथवा भेदभावाचा व्यवहार जसा आज केला जातो , प्राचिन काळात होत नव्हता. वैदिक सहित्यामध्ये हे सुद्धा प्रमाणित केलेले आहे की ’शुद्र’ मंत्रद्रष्टा ऋषि देखिल बनू शकतो. ’कवष ऐलुषु’ दासिपुत्र अर्थात शूद्र होते परंतू त्यांच्या विद्वत्तेला परखुन ऋषींनी त्यांना आपल्यात सामाऊन घेतले. ते ऋग्वेदाच्या अनेक ऋचांचे द्रष्टे होते. सत्यकाम जाबाली शूद्र असुन सुद्धा यजुर्वेदाच्या एका शाखेचे प्रवर्तक होते. (छान्दोगय ४.४) यातून हे स्पष्ट होते की, "शुद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता"म असे म्हणने चूकिचे ठरते. सामाजिकदृष्ट्या हा भेदभाव मुसलमान व इंग्रजांनी आपल्या-आपल्या राज्यकालांमध्ये या देशाला तोडण्याच्या उद्देशाने उत्पन्न केला आहे.
वस्तुत: वर्णव्यवस्था समाजात अनुशासन आणन्यासाठी , समाजाची उन्नती साठी आर्थीक विकासासठी बनवलेली होती.
डॉ. अपल्या ’शूद्र कॊण होते’ मध्ये प्रबळ प्रमाणांच्या आधारावर सिद्ध केले आहे की शूद्र वर्ण समाजातून भिन्न नव्हे तर क्षत्रियांचाच एक भेद आहे. संस्कृत साहित्यामध्ये सदाचरण वा असदाचरण यांच्या आधारावरच ’आर्य’, ’अनार्य’, ’दस्यु’,’दास’ इत्यादी संज्ञांचा प्रयोग केला गेलेला आहे. वास्तव मध्ये ’आर्य’ शब्दाला सुसंस्कारांनी सम्मानीत व धर्माचरण करनारा व्यक्ती साठी वापरलेला आहे.
आता निश्चित स्वरुपात संगितले जावू शकते की हे सुद्धा इंग्रजांद्वारा भारतीय समाज तोडण्याच्या उद्देशाने पसरवलेली भ्रांति व्यतरिक्त काहीही नाही.