Thursday, August 2, 2012

समाजसुधारणा व पक्षपात


सामन्यत: एका नाण्याच्या दोन बाजु असतात ,चांगली व वाईट आणि इथे ही नाण्याला दोनच बाजुच नाहीत तर त्या बाजु दोन्ही चांगल्या असुनही एक चांगली बाजु स्वत:च्या स्वार्थासाठी समोर आणली जाते आणि दुसरी चांगली बाजु जाणिवपुर्वक दुर्लक्षीत केली जाते . आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणि या नाण्याला दोन बाजु ’जात’ ही संकल्पना समोर ठेवून जाणिवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.
जगातील कोणत्याहि धर्मांच्या तुलनेत हिंदु धर्म परिवर्तनशिल आहे. परिवर्तन किंवा बदल हा निसर्गाचा नियम आहे. युनान रोम मिस्त्रा सब मिट गये यहा से, कुछ बात है की हस्ती मिटती नही हमरी , आणि ही हस्ती न मिटन्याच्या अनेक कारणांपैकी हिंदु धर्माची परिवर्तनक्षमता हे एक महत्वाचे कारण आहे. हिंदु धर्माने परिवर्तन कधीही नाकारलेले नाही तसेच धर्मत असलेले तत्वे, नियम , मान्यता यांची कोणावरही कधी सक्ती केली नाहि. ज्या ज्या वेळी धर्मामध्ये दोश घुसले त्या त्या वेळी राम , कृश्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम , स्वामी विवेकानंद अशा अनेक धर्म-सुधारकांनी धरमातील उणीवा आणि दोश नष्ट केल्या आणि पुन्हा एकदा एक निखळ असा धर्म समाजासमोर ठेवला. सांगण्याचा उद्देश एवढाच की हिंदु धर्मा मध्ये फार पुर्वीपासून म्हणजे अगदी व्यास , श्री कृष्ण यांपासुन ते आजच्या बाबा आमटे , बाबा रामदेव, टिळक, आगरकर, सावरकर, शाहु महाराज यांच्यापर्यंत अनेक धर्म सुधारक पर्यायाने आज आपण त्यांना समाजसुधारक म्हणतो हिंदु धर्मात होऊन गेले त्यांनी धर्म / समाजातील दोष मुळापासुन उपटून टाकले , काही वेळा असेही झाले की जुण्या काळात निर्धारीत केला गेलेला एक नियम आजच्या काळातील दोष असेल तर त्याला विरोध करुन त्याला एखाद्या बांडगुळाला बाजुला करावे त्याप्रमाणे बाजुला केले आणि निखळ असे तत्व समाजासमोर मांडले आणि कदाचीत हेच एक कारण आहे की जगातील कोणत्याहि धर्मात नसतील एवढे समाज/ धर्म सुधारल हिंदु धर्मात होऊन गेले त्याचप्रमाणे प्राचीन काळापासुन आजपर्यंत हिंदु धर्म नष्ट झालेला नाही.
आणि हीच गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. आणि काही समाजसुधारक ज्यांनी हिंदु धर्मातील बांडगुळे नष्ट करुन नवे तेज प्राप्त करुन दिले अशां काही मोजक्या (मोजक्या म्हणजे स्वत:ला झेपतील एवढ्या ) समाजसुधारकांना त्याच धर्माच्या विरोधात उभे करुन ते धर्मसुधारक हे कसे हिंदु धर्माच्या विरोधात होते हे त्यांचे तत्वज्ञान काटून छाटून समाजात प्रस्तुत केले जात आहे. त्यामुळे समाजसुधारक म्हणजे हिंदु धर्म विरोधक असे चित्र निर्माण करण्यात काही अंशी हे लोक यशस्वि झाले आहेत.
शाहु - फुले- आंबेडकर तत्कालीन समाजसुधारक , भारतीयांवर यांचे थोर उपकार आहेत. यांचे महानत्व कोणीही नाकारणार नाही. परंतु समाजसुधारक म्हटले की आपल्याला फक्त शाहु - फुले- आंबेडकरच आठवतात याचे कारण म्हणजे वर सांगीतल्याप्रमाणे याच मोजक्या समाजसुधारकांचे विचार या लोकांना झेपतात त्यामुळे अशांनी समाजसुधारक हेच काय ते आहेत असे चित्र तयार केले आहे आणि या महपुरुशांचा आधार घेवुन हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार चालु आहे. आणि याचमुळे समाजसुधारक म्हणजे असे की ज्यांनी धर्म नाकारला असे समिकरण तयार झाले आहे.
याठिकाणि आपण काही अगदी थोडक्यात अशी उदाहरणे पाहणार आहोत की जे समाजसुधारक शाहु - फुले- आंबेडकर यांच्या सोबत बसु शकत नाही कारण .. यांची समाजसुधारना या स्वार्थी लोकांना झेपत नाही.

* आचार्य  विनोबा भावे :- 

भारतीय समाजसुधारणेच्या कार्यामध्ये अचार्य विनोबाजिंचे भुदान आंदोनल अपण विसरु शकत नाही. १९५१ मध्ये तेलंगण प्रदेशामध्ये पोमपल्ली गावामधील मागासवर्गीयांच्या विनंतीवरुन तेथील धनिकांकडुन आपापल्या जमिनी सत्याग्रहाच्या मार्गावरुन मिळवण्यात यशस्वि झाले. आणि हे आंदोनल जणु एका ऐतीकहासीक आंदोलनाची सुरवात होते. आचार्यजिंनीपुर्ण देशाभर यात्रा करुन सर्व भुमिधारक धनिकांना आपल्या जमिनिचा सातव हिस्सा भूमी रहीत गरिब, दलित पिडीतांना देन्याचे आवाहन केले हे आंदोलन पुर्णत: अहिंसात्मक आणि शांततापुर्ण होते आणि या आंदोलनातुन मिळालेल्या जमिण आणि संपतीतुन त्यांनी १००० गांवांमध्ये निर्धन लोकांची राहायची व्यवस्था केली त्यांपैकी १७५ गाव एकट्या तामिळनाडू मध्ये वसवले गेले.


* धोंडो केशव कर्वे :- 
लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाजरीत नाकारणार्‍या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणार्‍या आनंदी या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणार्‍या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर
घालणे हे या मंडळाचे काम होते. अनिकेत कन्यांसाठी १८९९ मध्ये अण्णांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि इश्वर चंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यामुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
सन १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी `निष्काम कर्म मठा'ची स्थापना केली.
पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन समाजाचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी भारतीय महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून ९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणार्‍या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी


चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांनी डी. लीट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच १९५८ साली त्यांना भारतातील सर वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. असे अण्णा काही नतद्रष्ट लोकांच्या समाजसुधारकांच्या यादीमध्ये बसत नाहीत.

* भारतरत्न पांडुरंग वामन काणे


 :- विख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक.  काणे यांची सामाजिक व धार्मिक दृष्टी पुरोगामी होती.  हिंदू  धर्मसुधारणेच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा त्यांनी निषेधच केला. सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठलपूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह, घटस्फोट यांचा त्यांनी पुरस्कार केला. १९४६ साली
नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. काणे यांचा अनेक संस्थांशी निकटचा संबंध होता आणि ह्या संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभत होते. यामध्ये “एशियाटिक सोसायटी”, “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था”, “महाराष्ट्र साहित्य परिषद”, “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” इ. संस्थांचा समावेश आहे. आपल्या हयातीतच काणे यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी देऊन गौरव केला. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठाने त्यांना “डी.लिट”. ही सन्माननीय पदवी दिली. संस्कृत भाषेचे एक मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतीचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. पढीक पांडित्याच्या चौकटीत न बसणारी पुरोगामी दृष्टी हे काणे यांचे वैशिष्ट्. भारतीय संस्कृती व धर्म यांचा इतिहास महामहोपाध्याय काणे यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

* गोपाळकृष्ण गोखले :- 
भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. अस्पृश्यता व जाती व्यवस्था निर्मूलनासाठी तसेच स्त्री शिक्षणासाठीही त्यांनी प्रयत्न केले. १९०५ साली भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. सुधारक, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रातून सुधारणा विषयक विचार गोखले यांनी वेळोवेळी मांडले. गोखले यांचे दूरगामी विचार भारतीय राजकारणावर परिणाम करून गेलेले दिसतात.





* गोपाळ गणेश आगरकर :- 

 महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.


* आनंदीबाई गोपाळराव जोशी :- 

 आनंदीबाईनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भार ामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही .. मी माझा हिन्दुधर्म , संस्कृती यांचा कदापी त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येउन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायचे आहे . आनंदीबाईचे हे भाषण खुप लोकप्रिय झाले . त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहिर केला.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.एम् डी झाल्यावर राणी विक्टोरियाकडून ही त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना गोपालरावांचा वृक्षासारखा आधार होता म्हणूनच आनंदीबाई ची जीवन वेली बहरत गेली.
एम् डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनन्दन झाले. त्यांना कोल्हापुर मधील एक स्थानिक हॉस्पिटलमधील स्त्रीकक्षाचा ताबा देण्यात आला.



* न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 

भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.  सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणेसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या.  विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रूजवायचा प्रयत्न केला. तसेच बालविवाह आणि जातीयता या समाज विघातक रूढींविरोधी जागृती निर्माण करण्याचं कार्य न्या. रानडे आपल्या चळवळींद्वारे करीत असत.

* स्वातंत्र्यविर सावरकर :-

सावरकर एक प्रख्यात समाससुधारक होते त्यांच्या विश्वास होता की सामाजीक व सार्वजनिक सुधार हे एकमेकांना पुरक आहेत. त्यांनी आपल्या भाषणां, लेख व कृती मधुन सुधारणेसाठी निरंतर प्रयत्न केले. सावरकरांच्या मतानुसार हिंदु समाज त्याकाळी सात बेड्यांमध्ये अडकुन होता.
१) स्पर्ष बंदी : - खालील जातितिल लोकांना स्पर्ष करणे निशिद्ध.
२) रोटी बंदी :- खालच्या जातीतील लोकांसोबत खाने पिणे निशिद्ध.
३) बेटी बंदी :- खालच्या जातीतील विवाह करणे निशिद्ध.
४) व्यवसायबंदी :- काही निश्चीत व्यवसाय करण्यास निशिद्ध.
५) सिंधु बंदी :- सागरयात्रा केल्यने विटाळ होतो वगैरे कल्पना.
६) वेदोक्त बंदी :- वेदाच्या कर्मकांडाशी एका वर्गाला निशिद्ध.
७) शुद्धि बंदी :- हिंदु धर्मातून धर्मांतर झालेल्याला पुन्ह: हिंदु होता न येणे

त्यांनी रत्नागिरिमध्ये सर्व जातीतील लोकांसाठी असे पतित पावन नावाचे मंदीर उभारले.
सावरकरांच्या सामाकीक कार्याविषयी अधीक जाणुन घेण्यासाठी खालील किंक्स फॉलो करा

समाजसुधारणा


* मुरलीधर देविदास तथा बाबा आमटे

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे.

विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ साली त्यांचा जन्म झाला. बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली. पण १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर कुष्ठरोग/महारोग सेवा समितीची त्यांनी स्थापना केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवना’ची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर केवळ वैद्यकीय उपचार करण्याइतकचं मर्यादित काम न करता कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातून



वरील सर्व समाज सुधारकांचे दुर्दैव येवढेच की हे समाजसुधारक केवळ एका विषीष्ठ वर्गाशी संबंधीत असल्यामुळे ते शाहु-फुले-आंबेडकर यांच्या पंक्तीत बसु शकत नाही आणि अर्थात याचा या महापुरुषांच्या कार्यावर जराही फरक पडणार नाही हे काही वेगळे सांगायला नको.


गागाभट्ट : आक्षेप व खंडण

गागाभट्टांनी राजेना छळले

एखाद्याला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्‍याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्‍याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.

आज आपण असेच एक ताळतंत्र सुटुन केलेल्या आरोपांमधीलच एक आरोपाबद्दल चर्चा करणार आहोत. तो आरोप म्हणजे गागाभट्टांनी राजांना छळले , म्हणुन . मुद्दा नंबर एक _ गागाभट्ट हे वाईट आणि दोन _ पर्यायाने पुर्ण ब्राम्हण समाज वाईट. बरं जर असे समिकरण्च बनवले असेल की जर एखाद्याने राजांना छळले , तर त्याला दोश द्यायचाच त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या समाजतील असेल त्या समाजालाही दोश द्यायचा तर मग असा समाजच उरत नाही की ज्यानी राजांना छळले नाही त्याचे काय ??

बरे याठिकाणी आपल्या हे लक्षात येते की "गगाभट्टांनी राजांना छळले" असेल तर कोणीही येवुन राजेंना छळावे इतके राजे दुधखुळे होते का ? एक एक मावळा , सरदार, साथिदार अगदी पारखुन घेणारे शिवराय गगाभट्टांनी त्यांना छळावेइतके खुळे होते का ? गगाभट्टांनी राजांना छळले या आरोपकर्त्यांच्या आरोपामधुन राजेंबद्दल जनतेमध्ये काय संदेश जातो. एखाद्या अवख्याने जर असे काही ऐकले तर त्याचे राजेंबद्दल काय धारंणा होईल ? याचा विचार हे लोक करत असतील का किंवा इतका साधा विचार करण्यची क्षमता या लोकांकडे नसेल का हा प्रश्न पडतो.

आता थोडे मुळ मुद्द्याकडे वळू हे लोक शिवरायांचा गागाभट्टांनी राज्याभिशेक केल्यावर शिवरायांनी गागाभट्टांना जे काही द्रव्य दिले त्यावरुन गागाभट्टांनी शिवरायांना छळले किंव लुटले असे हे लोक म्हणतात. असे असेल तर काय शिवरायांनकडे केवळ इतकेच द्रव्य होते की जे केवळ एका ब्राम्हणाला दिलेल्या दक्षीनेने संपुन जावे ? तत्कालीन साहीत्य अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येते की गागाभट्टांनी शिवरायांचा सन्मानपुर्वक राज्याभिषेक केला व त्याच्या बदल्यात शिवरायांनी सभासद बखरी नुसार "एक करोड बेचाळीस लक्ष होन " इतकी दक्षीणा दिली आणि अर्थात एक करोड बेचाळीस लक्ष होन जर द्याल तर मी तुमचा राज्यभिषेक केला अशी अट गागाभटांनी शिवरायांना घातलेली कोठेही आढळणार नाही किंवा तशी शोधने ही मुर्खपणाचे ठरेल. शिवरायांनी गागाभटांना वरील दक्षीणा स्वेच्छेने दिलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जी गागाभट्टांनी शिवरायांकडून अपरिमित द्रव्य घेतले आणि त्यांचा राज्याभिशेक केला हे सांगताना जाणिवपूर्वक आपल्यापासुन लपवली किंवा इतकी कमी महत्व देवुन सांगीतली जाते की त्याचे महत्व आपल्याला वाटत नाही . आणि ति म्हणजे की शिवरायांनी फक्त्त गागाभटांनाच काय ते द्रव्य दिले किंवा दक्षीणा दिलि असे नाही तर या विशयी बखरकारांच्या नुसार. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी इत्यादिंना चार महिने पुरेल इतके मिश्ठान्न दिले. अष्ट प्रधान मंडळातील प्रत्येकास एक लक्ष होण तसेच एक हत्ती , घोडा, वस्त्रे, अलंकार वगैरे देण्यात आले. आता हे गागाभट्टांवर आरोप करणारे अतिशहाणे असे म्हणतील का की त्या अतिथी,तपोनिधी ,सत्पुरुष, संन्यासी व अष्टप्रधान मंडळ या सर्वांनी मिळून शिवरायांना छळले म्हणुन ?

आणखी एक येथे सांगायचा मुद्दा म्हणजे की गागाभट्टांनीच शिवरायांना राजाभिशेक करवुन घ्यावा असे सुचवलेले तत्कालीन लिखानामध्ये सापडते . हे सत्य लपवुन गागाभट्टांनी राजेंना छळले असे म्हणनार्‍यांना काय म्हणावे ?

ज्या गागाभट्टांच्या नावाने हे अविचारी लोक बोटे मोडतात त्या गागाभट्टांचबद्दल तत्कालीन बखरकारांनी "वेदमूर्ती राजर्षी " तसेच "भट गोसावी , थोर पंडीत, चार वेद सहा शास्त्रे, योगसंपन्न, ज्योतिषी, मांत्रीक , सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रम्हदेव , पंडीत" असे गौरवोद्कार काढले आहेत.

याच्यापलीकडे आणखी काही लिहायचे आणि वाचणार्‍यांनी समजायचे बाकी राहीले असेल असे वाटत नाही. हा सुर्य आणि हा जयद्रत.

जर वाघ्या कुत्रा, तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही

संभाजी ब्रिगेड ने वाघ्या कुत्रा फोडल्याचे वृत्त समजले. वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीन कागदपत्रे- अथव बखरिंमध्ये आढळत नाही म्हणुन वाघ्याचा पुतळा फोडण्यात आला . आणि या बातमीचे कोल्हापुरचे इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले. याठिकाणी आधीच स्पष्ट करतो की वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीनही कोणत्याही बघर अथवा पुस्तकामध्ये नाही हे मलाही माहीत आहे आणि याठिकाणी विषय वाघ्या अस्तित्वात होता की नव्हता हा इथे नाहीच आहे मूळी . या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ने वाघ्याचा पुतळा फोडला .. हा विषय आहे. आणि या संभाजी ब्रिगेड च्या कारवाईला वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता म्हणुन तो खनुन काढला असे समर्थन केले जाते.  असे असेल तर अशांना माझा  एक प्रश्न आहे. ..ज्याप्रकारे वनखात्याच्या जमिनिवर त्या मराठ्यांवरील आक्रमकाचे उदात्तिकरण झाले आहे ते तुझ्या डोळ्यात खुपत नाही का ? ज्या महाराष्ट्रात शिवा काशीदांच्या समाधीला साधे छत नाही त्याच महाराष्ट्रार त्या हरामखोर अफजलखानाची समाधी आत्तराने पुसली जाते हे पाहुन तुला काहीच वाटत नाही ? याचा साधा अर्थ संभाजी ब्रिगेड च्या लोकांना अफजलखाना पेक्षा वाघ्या कुत्रा जास्त धोकादायक वाटतो हे विषेश . आणि आता जर वाघ्या फोडलाच असेल तर पुढे अफजल खान समाधीचे अतिक्रमण कधी खणायचा संभाजी ब्रिगेड चा मानस आहे किंवा आहे पण कि नाही आणि नसेल तर का नाही ?? तसेच सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम करायची तयारी आहे का ??? या प्रश्नांची उत्तरे इंद्रजीत सावंत किंवा वाघ्या फोडणारे देतील का ?? 
वाघ्या कुत्र्याचा पुतळा फोडायची अक्कल आहे मग सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम स्वखर्चाने आणि स्वतःच्या हाताने बांधण्याची अक्कल नाही का आली? शिवराज्यअभिषेक दिनाच्या दिवशी पुतळा फोडणार होतात तेव्हा का नाही फोडला? कारण माहित होते की जमलेली सगळी गर्दी तुमच्या विचारांची न्हवतीच मुळात, आता जेव्हा कुणीच न्हवते तेव्हा फोडलात पुतळा? एवढीच धमक होती तर बांधायचा होता कल्याण दरवाजा, प्रतापगडाचे ढासळलेले बांधकाम. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे.जर वाघ्या तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही ?? आहे उत्तर वाघ्या फोडणार्‍यांकडे ??    
अफजलखानचे अनधिकृत बांधकाम , शिवरायांच्या जवळ-जवळ सर्वज किल्ल्य्यांची होत चाललेली दुर्दशा सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे आणि सिंधुदुर्गाचे कोसळलेले बांधकाम असे विषय जाणीवपुर्वक बाजुला सारुन वाघ्या कुत्र्याला टार्गेट करण्यामागे शिवरायांप्रती प्रेम अथवा भक्ती असणे शक्यच नाही.