Showing posts with label बाबासाहेब आंबेडकर. Show all posts
Showing posts with label बाबासाहेब आंबेडकर. Show all posts

Monday, November 19, 2012

बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारला नाही ही त्यांची चूक होती का ??

काही दिवसांपुर्वी माझा बौद्ध मित्र पियुश खोब्रागडे याच्या ब्लॉग वरील "काय आपण बुद्धाचा महार करुन ठेवलाय ?" हा एक अतिषय सुंदर व अंतर्मुख करणारा लेख वाचनात आला, अपेक्षीत आणि दुर्लक्षीत अशा एका मुद्द्यामध्ये पियुष ने हात घातला होता याबद्दल मी त्याचे कौतूक करीन. जे "खरे बौद्ध" आहेत किंवा ज्यांना, भगवान बुद्धांच्या शिकवणूकीने चालणारे , आर्य अष्टांगमार्ग पाळणारे,  भगवान बुद्धांनी सांगीतल्याप्रमाणे अध्यात्मिक व पारमार्थीक साधना करणारे पियुश सारखे ज्यांना "बौद्ध" म्हणावे असे बौद्ध खुप कमी भेटत आहेत. आणि बौद्ध धर्माचा आधार घेवून स्वत:चे नाकर्तुत्व झाकण्यासाठी हिंदु धर्मावर टिका करणारे बौद्ध हे आपल्याला आज जागोजागी आढळतात, आणि याचमुळे समाजात बौद्ध धर्माचा आणि भगवान बुद्धांची प्रतिमा अतिशय मलीन होत आहे या गोष्टीचा  सर्व "बौद्ध" बांधवांनी विचार केला पाहीजे, बाबासाहेब आंबेडकरांनी कटाक्षाने नविन एखादा धर्म स्थापन न करता व ईस्लाम किंवा ख्रिस्ती सारखे परके धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला, हे काही लोक विसरत चालले आहेत व त्याच बाबासाहेबांच्या नावाने आणी त्याच बौद्ध धर्माचा आधार घेवून हे अविचारी लोक इस्लाम व ख्रिस्ती धर्माला पुरक असे काम करत आहेत यामध्ये बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा अपमानच नाही का ?  तथाकथीत शिवधर्मी लोकांना मी नेहमी विचारत असतो की अशी काय कमी बौद्ध धर्मामध्ये होती की त्यांनी बौद्ध धर्मालाही लाथाडून स्वत:चा असा नविन धर्म काढला  ?? त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांनी  नविन धर्म स्थापण न करता बौद्ध धर्म स्विकारला ही बाबासाहेबांची चूक होती असा चुकीचा समज समाजात पसरत आहे याचा विचार होणार आहे की नाही माहीत नाही. आणि याचमुळे कदाचीत मधुकर रामटेकेंसारखे बौद्ध विचारवंत या तथाकथीत नविन धर्म वाल्यांच्या नवधर्माला विरोध करत म्हणतात, "जय भीम ला रिप्लेस करतोय जय मुलनिवासी". रामटेके सरांनी या तथाकथीत दिखाऊ नविन धर्म वाद्यांची दिखाऊ बौद्ध भक्ती पुरेपूर उघडी पाडली आहे. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु धर्मावर टिका करन्याचे सर्टिफिकिट , मग त्या बुद्धांची शिकवण काय आहे हे भले माहीत नसो , त्या आर्य अष्टांगमार्गचा आम्हाला गंध ही नको असे काही समिकरण झाले आहे आणि असे होत होत अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म बदनाम होत आहे याचा विचार बौद्ध विचारवंतांनी व भगवान बुद्धांच्या तत्वांशी प्रामाणीक असणार्‍या माझ्या बौद्ध बांधवांनी अवश्य करावा. मगे महाविर सांगली करांच्या ब्लॉग मध्ये वाचले होते की बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता म्हणुन बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म स्वीकारण्यागोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता पण या दोन्ही धर्मांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराला विरोध त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला, आणि त्याचीच फळे आज भगवान बुद्ध व बौद्ध बंधव आज भोगताना दिसत आहेत. आजपर्यंत मला जेजे नवबौद्ध भेटले त्यांपैकी एकालाही भगवान बौद्धांची आर्य अष्टांगमार्ग माहीतही नाहीत काय आहेत ती यावेळी यांच्या तोंडून चकार शब्द ही फुटत नाही परंतु हिंदु धर्म आणि वर्णव्यवस्था / जातव्यवस्था असे विषय काढायचा अवकाश, जिवाच्या आकांताने चर्चेत सहभागी घेतात (नुसते बोलायला काय जाते म्हणा ..). ज्या वर्णवादाचा आणि जातीवादाचा शिक्का पुसला जावा म्हणुन बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला त्याच बौद्ध धर्माच्या आडोशाला उभारुन आता आपल्या जे काही असतील त्या वर्णाचा आणि जातीचा अभिमान बाळगताना हे लोक दिसत आहेत (शुद्रा: द रायजिंग म्हणे ..). अरे  आधी स्वत: ठरवा की आपल्याला नेमके काय करायचे आहे, जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत कि त्या तशाच ठेवुन त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. हे ही साधे विषय स्पष्ट नसणारे मुर्ख मनु:स्मृती / वर्णव्यवस्था वगैरे वगैरे गोष्टी करत आहे हे पाहुन खुप हसू येते.

    बाबासाहेबांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म कटाक्षाने टाळले त्याच धर्मांचा अप्रत्यक्षपणे स्विकार शिवधर्माच्या माध्यमातुन बाबासाहेबांचेच नाव घेवून केला जात आहे. सन २००१ मध्ये डबरण येथे WCC (Word Church Council)  चे विश्वसंमेलन झाले, त्यामध्ये  भारतीय दलीत नेत्यांनी सुद्धा हजेरील लावली. पाकीस्तान मधील झाईद हमीद सारख्या भारतद्वेश्टा म्हणतो "भारतामध्ये काही हिंदु (गझुआ-ए-हिंद) अलाह चे पवित्र कार्य एक हिंदु रहुनच करत आहे" याचा अर्थ काय घ्यायचा ?? याच विद्रोही लोकांच्या घरी परदेशी चलन सापडले, या लोकांनी आता शिवरायांच्या नावाने मुस्लिम ब्रिगेडही चालू केली आहे आहे आणि या मुस्लिम ब्रिगेड च्या कार्यक्रमांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात ,..... या सगळ्या गोष्टिंचा काय अर्थ होतो ? तथाकथीत काही विद्रोही लोक भगवान बुद्धांचे नाव घेवु भोळ्या बौद्ध बांधवांना चुकिच्या आणि विरुद्ध दिशेने घेवुन जात आहेत हे बौद्ध बांधवांनी समजुन घेतले पाहीजे, भगवान बुद्ध हे हिंदु धर्मीयांना कधीही प्रियच आहेत, बुद्धांनी तर कधीच जातीवाद मानला नाही त्यांचे महाम्मोगल्लान सारखे अनेक शिष्य हे त्याकाळी वरिष्ठ अशा समजल्या जाणार्‍या समाजातील होते, भगवान बुद्धांना विष्णुचे नववे अवतार हिंदु मानतात (बुद्ध हे विष्णूचे अवतार होते की नाही याची चर्चा मला इथे करायची नाहीये .) सांगण्याच उद्देश येवढाच की भगवान बुद्ध हे हिंदुंना वंदनियच आहे परंतु काही लोकांनी भगवान बुद्धांची प्रतीमा समाजामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे (बर्‍याचशा प्रमाणात  केली ही आहे ) . तो आपल्याला हानुन पाडायचा आहे.

Thursday, October 25, 2012

विद्रोहाचा अंत इथे .

          आज या देशा मध्ये, विषेशत: महाराष्ट्र आणि पंजाब जेथे देशातील लढवय्या समाज जो मराठा आणि शिख या नावानी वास करतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फुटीरतेची बिजे रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. येथला ब्राम्हणद्वेशाचा मुद्दा ही त्याच बिजांचा परिणाम आहे. आज महाराष्ट्रात विद्रोही म्हणत असलेल्याप्रमाणे नेमका किती प्रमाणात ब्राम्हण्यवाद चालु आहे आणि त्यामध्ये सध्याच्या ब्राम्हणांचा किती वाटा आहे याची जाणि जाणि तथाकथीत विद्रोह्यांना असल्यामुळेच कदाचीत हे विद्रोही क्षणो -क्षणी आपल्या अनुयायांची माथि भडकवायला नेहमी विकृत इतिहासाकडे जातात. इतिहासात यांनी असे केले , इतिहासात त्यांनी तसे केले म्हणुन आज आम्हि सराकट ब्राम्हण समाजाची कत्तल करण्याची भाषा करत आहोत, हे किति बरोबर आहे याचा विचार त्यांचे अनुयायी म्हणवणारे तथाकथीत सत्यशोधक, विद्रोही ( न जाणो आनखी काही विषेषणे आहे त्यांचा उल्लेख न करणेच योग्य) हे लोक का करत नाहीत मला कळत नाही. यांच्या या ब्राम्हणद्वेशाला सुशिक्षीत समाज भिक घालत नाही. तसेच सध्या यांच्या यांच्यातच मतभेद चालू आहेत या केवळ "हिंदु" विरोधासाठी एकवटलेल्या विभिन्न विचारसणीच्या टोळ्यांमध्ये आपल्या विचारसरणीला धरुन वादविवाद (याच्याही पुढे जाऊन थेट आरोप आणि शिव्याशापही) होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्रोही चळवळीतील अनेक मान्यवरांना काही विद्रोही लोकांचा अति-ब्राम्हणद्वेश अजिबात मान्य नाही , तर या अतिउत्साही ब्राम्हणद्वेश करणार्‍यांना काही प्रौढ मान्यवरांचे प्रौढ विचार पचनि पडत नाहीत.  ज्या बाबासाहेबांनी हिंदु देवदेवता व संतांना रामराम ठोकुन बौद्ध स्विकारला होता , त्याच बाबासाहेबांचे नाव घेवुन हेच विद्रोही त्याच बाबासाहेबांना त्याच हिंदु साधु संतांच्या पंक्तीत बसवुन त्यांच्यासोबत बाबासाहेबांचाही जयघोष करताना दिसतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायांच्या पचनी पडत नाही , तर विद्रोह्यांना या लोकांचा बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायीवाद हा अति-आंबेडकरवादी वाटतो. हे विद्रोही बौद्ध धम्म आणि भगवान बुद्धांना आपले मानतात तर दुसरीकडे बौद्ध धर्म न स्विकारता स्वत:चाच असा वेगळा धर्म काढून बुद्धांच्या अनुयायांना आपल्या या नव्या धर्मात येणयासाठी आवाहन करतात आणि ही गोष्ट बौद्ध अभ्यासकांच्या पचनी पडत नाही तेव्हा ते सरळ सरळ विद्रोह्यांना व त्यांच्या अनुयायांना बौद्ध धर्मातच यायचा सल्ला देतात. पण हा सल्ला विद्रोह्यांना पेलवत नाही. इतकेच काय तर हिंदु संकृतीवर बेंबीच्या देठापासुन ताशेरे ओढणारे अनेक विद्रोही नेते हे स्वत: घरी सत्यनारायणाची पुजा घालतात, घारामध्ये हिंदु पद्धतीचे सण-उत्सव साजते करतात , आणि याच्याही पलिकडे ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद म्हणुन राण उठवणार्‍यांना बायको कशी ब्राम्हण चालते हे मला आजतागायत पडलेले कोडे आहे. एकिकडे हिंदु धर्माने स्त्रियांना उंबरठ्यापलीकडे जाऊ दिले नाही म्हणुन हिंदु धर्माला शिव्या शाप द्यायच्या त्याच स्त्रियांची आजची परिस्थिति काय आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आजपर्यंत या लोकांनी काय प्रयत्न केले याची माहीती मला आजपर्यंत एकाही विद्रोह्यांनी दिलि नाहि, कदाचीत स्त्रिला हजार सालापुर्वी ज्यांनी कोंडून ठेवले त्यांच्या नावाने बोंबा मारल्या की आजच्या स्त्रियांच्या समस्या सुटतील असा यांचा समज असावा बहुतेक. याच्याही पलिकडे जाऊन हे हिंदु धर्माला शिव्या देत देत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचे गोडवेही गाऊ लागले आहेत, आणि ते ही चक्क बाबासाहेबांचे नाव घेवुन . ज्या बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातुन ओरडून ओरडून सांगीतले की "मुसलमानांचे बंधुत्व हे सर्व मनुष्यांकरिता नसुन ते फक्त मुस्लिमांपुरते मर्यादीत आहे. जे मुस्लिम संघाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरीता घृणा व शत्रुता याच्याविना काही नाही" किती विरोधाभास हा ? आंबेडकरांची इतर पुस्तके स्वत:च्या रसभरीत अनुवादासहीत प्रकाशित करुन मोफत वाटणारे त्यांच आंबेडकरांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तका बद्दल ब्र ही काढत नाही याचे कारण काय बरे असावे ? शेवटी केवळ हिंदु द्वेश या एका समिकरणातुन एकत्र आलेले हे अभद्र एकत्रिकरण आता स्वत:मधेच असलेल्या अंतर्गत वादातुन नष्ट होईल यात शंका वाटत नाही.