Monday, November 19, 2012

बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारला नाही ही त्यांची चूक होती का ??

काही दिवसांपुर्वी माझा बौद्ध मित्र पियुश खोब्रागडे याच्या ब्लॉग वरील "काय आपण बुद्धाचा महार करुन ठेवलाय ?" हा एक अतिषय सुंदर व अंतर्मुख करणारा लेख वाचनात आला, अपेक्षीत आणि दुर्लक्षीत अशा एका मुद्द्यामध्ये पियुष ने हात घातला होता याबद्दल मी त्याचे कौतूक करीन. जे "खरे बौद्ध" आहेत किंवा ज्यांना, भगवान बुद्धांच्या शिकवणूकीने चालणारे , आर्य अष्टांगमार्ग पाळणारे,  भगवान बुद्धांनी सांगीतल्याप्रमाणे अध्यात्मिक व पारमार्थीक साधना करणारे पियुश सारखे ज्यांना "बौद्ध" म्हणावे असे बौद्ध खुप कमी भेटत आहेत. आणि बौद्ध धर्माचा आधार घेवून स्वत:चे नाकर्तुत्व झाकण्यासाठी हिंदु धर्मावर टिका करणारे बौद्ध हे आपल्याला आज जागोजागी आढळतात, आणि याचमुळे समाजात बौद्ध धर्माचा आणि भगवान बुद्धांची प्रतिमा अतिशय मलीन होत आहे या गोष्टीचा  सर्व "बौद्ध" बांधवांनी विचार केला पाहीजे, बाबासाहेब आंबेडकरांनी कटाक्षाने नविन एखादा धर्म स्थापन न करता व ईस्लाम किंवा ख्रिस्ती सारखे परके धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला, हे काही लोक विसरत चालले आहेत व त्याच बाबासाहेबांच्या नावाने आणी त्याच बौद्ध धर्माचा आधार घेवून हे अविचारी लोक इस्लाम व ख्रिस्ती धर्माला पुरक असे काम करत आहेत यामध्ये बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा अपमानच नाही का ?  तथाकथीत शिवधर्मी लोकांना मी नेहमी विचारत असतो की अशी काय कमी बौद्ध धर्मामध्ये होती की त्यांनी बौद्ध धर्मालाही लाथाडून स्वत:चा असा नविन धर्म काढला  ?? त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांनी  नविन धर्म स्थापण न करता बौद्ध धर्म स्विकारला ही बाबासाहेबांची चूक होती असा चुकीचा समज समाजात पसरत आहे याचा विचार होणार आहे की नाही माहीत नाही. आणि याचमुळे कदाचीत मधुकर रामटेकेंसारखे बौद्ध विचारवंत या तथाकथीत नविन धर्म वाल्यांच्या नवधर्माला विरोध करत म्हणतात, "जय भीम ला रिप्लेस करतोय जय मुलनिवासी". रामटेके सरांनी या तथाकथीत दिखाऊ नविन धर्म वाद्यांची दिखाऊ बौद्ध भक्ती पुरेपूर उघडी पाडली आहे. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु धर्मावर टिका करन्याचे सर्टिफिकिट , मग त्या बुद्धांची शिकवण काय आहे हे भले माहीत नसो , त्या आर्य अष्टांगमार्गचा आम्हाला गंध ही नको असे काही समिकरण झाले आहे आणि असे होत होत अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म बदनाम होत आहे याचा विचार बौद्ध विचारवंतांनी व भगवान बुद्धांच्या तत्वांशी प्रामाणीक असणार्‍या माझ्या बौद्ध बांधवांनी अवश्य करावा. मगे महाविर सांगली करांच्या ब्लॉग मध्ये वाचले होते की बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता म्हणुन बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म स्वीकारण्यागोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता पण या दोन्ही धर्मांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराला विरोध त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला, आणि त्याचीच फळे आज भगवान बुद्ध व बौद्ध बंधव आज भोगताना दिसत आहेत. आजपर्यंत मला जेजे नवबौद्ध भेटले त्यांपैकी एकालाही भगवान बौद्धांची आर्य अष्टांगमार्ग माहीतही नाहीत काय आहेत ती यावेळी यांच्या तोंडून चकार शब्द ही फुटत नाही परंतु हिंदु धर्म आणि वर्णव्यवस्था / जातव्यवस्था असे विषय काढायचा अवकाश, जिवाच्या आकांताने चर्चेत सहभागी घेतात (नुसते बोलायला काय जाते म्हणा ..). ज्या वर्णवादाचा आणि जातीवादाचा शिक्का पुसला जावा म्हणुन बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला त्याच बौद्ध धर्माच्या आडोशाला उभारुन आता आपल्या जे काही असतील त्या वर्णाचा आणि जातीचा अभिमान बाळगताना हे लोक दिसत आहेत (शुद्रा: द रायजिंग म्हणे ..). अरे  आधी स्वत: ठरवा की आपल्याला नेमके काय करायचे आहे, जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत कि त्या तशाच ठेवुन त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. हे ही साधे विषय स्पष्ट नसणारे मुर्ख मनु:स्मृती / वर्णव्यवस्था वगैरे वगैरे गोष्टी करत आहे हे पाहुन खुप हसू येते.

    बाबासाहेबांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म कटाक्षाने टाळले त्याच धर्मांचा अप्रत्यक्षपणे स्विकार शिवधर्माच्या माध्यमातुन बाबासाहेबांचेच नाव घेवून केला जात आहे. सन २००१ मध्ये डबरण येथे WCC (Word Church Council)  चे विश्वसंमेलन झाले, त्यामध्ये  भारतीय दलीत नेत्यांनी सुद्धा हजेरील लावली. पाकीस्तान मधील झाईद हमीद सारख्या भारतद्वेश्टा म्हणतो "भारतामध्ये काही हिंदु (गझुआ-ए-हिंद) अलाह चे पवित्र कार्य एक हिंदु रहुनच करत आहे" याचा अर्थ काय घ्यायचा ?? याच विद्रोही लोकांच्या घरी परदेशी चलन सापडले, या लोकांनी आता शिवरायांच्या नावाने मुस्लिम ब्रिगेडही चालू केली आहे आहे आणि या मुस्लिम ब्रिगेड च्या कार्यक्रमांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात ,..... या सगळ्या गोष्टिंचा काय अर्थ होतो ? तथाकथीत काही विद्रोही लोक भगवान बुद्धांचे नाव घेवु भोळ्या बौद्ध बांधवांना चुकिच्या आणि विरुद्ध दिशेने घेवुन जात आहेत हे बौद्ध बांधवांनी समजुन घेतले पाहीजे, भगवान बुद्ध हे हिंदु धर्मीयांना कधीही प्रियच आहेत, बुद्धांनी तर कधीच जातीवाद मानला नाही त्यांचे महाम्मोगल्लान सारखे अनेक शिष्य हे त्याकाळी वरिष्ठ अशा समजल्या जाणार्‍या समाजातील होते, भगवान बुद्धांना विष्णुचे नववे अवतार हिंदु मानतात (बुद्ध हे विष्णूचे अवतार होते की नाही याची चर्चा मला इथे करायची नाहीये .) सांगण्याच उद्देश येवढाच की भगवान बुद्ध हे हिंदुंना वंदनियच आहे परंतु काही लोकांनी भगवान बुद्धांची प्रतीमा समाजामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे (बर्‍याचशा प्रमाणात  केली ही आहे ) . तो आपल्याला हानुन पाडायचा आहे.

Sunday, November 11, 2012

महाभारतातील वर्णवाद : एकलव्य ??

सध्या वैदिक पुराण, ग्रंथामधील कथा व घटनांना ओढून ताणून जातियवाद लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे , अशा लोकांच्या अपप्रचाराच्या गळाला लागलेली असा एक घटन म्हणजे "एकलव्य". वैदीक काळातही अश्पृष्यता होती हे ठासुन सांगताना मेकॉलेचे आजचे तथाकथीत हस्तक हे एकलव्याचे उदाहरण देतात व द्रोणाचार्यांनी एकलव्याला तो हिन कुळातील असल्यामुळे त्याला धनुर्विद्येचे शिक्षण घेता येणार नाही असे म्हटले. असा मुळ घडनेला (काही प्रमाणात  मुळ कथा तोडून ) युक्तिवाद करतात. सर्वात पहिलि गोष्ट म्हणजे आजचे मेकॉलेचे हस्तक इंग्रजांप्रमाणे रामायण , महाभारत वगैरे मिथक मानत आहेत, म्हणजे महाभारत घडलेच नाही असे यांचे मत आहे , असे असताना हे लोक द्रोणाचार्यांचे - एकलव्याचे उदाहरण देतात हे विषेश आहे.
    तर वेदकाळात कोणत्याही प्रकार चा "जातीयवाद" अस्तित्वात नव्हता हे आता समाजासमोर आलेले आहे, होता तो वर्णवाद, त्याकाळी माणसाला वर्ण बदलता येत होता कारण वर्ण हा त्याच्या व्यवसायावर आधारीत होता जातीवर नाही [ उदा. विश्वामित्र हा क्षत्रिय होता तरी तो पुरोहीताचा व्यवसाय करीत असे ]. आणि जात ही जन्मावर आधारीत असल्यामुळे ती बदलता येत नाही. एकलव्य हा हिन कुळातील होता असा उल्लेख आहे त्याला "द्रोणाच्यार्याकडूनच" धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे होते , परंतु याठीकाणी एक गोष्ट बहुतेकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे द्रोणाचार्य यांना  त्यावेळी राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी नेमले होते व इतर लोकांसाठी कृपाचार्य विद्या देत, महाराथी कर्ण हे त्याचे उदाहरण. कर्ण त्या वेळी सुतपुत्र म्हणुन प्रसुत होता , त्याचीही द्रोणाच्यार्यांकडून आपणास धनुर्विद्येचे शिक्षण मिळावे असा कायस होता परंतु द्रोणाचार्य हे राजपुत्रांसाठी नेमलेले होते, त्यामुळे कर्णाला नाईलाजाने कृपाचार्यांकडे शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे महाभारत काळात क्षत्रीय सोडून इतरांना शिक्षण / विद्या  घेण्याचा अधीकार नव्हता हा मुद्धा मोडीत निघतो. आता राहीला प्रश्न द्रोणाचार्यांनी एकलव्याला दिलेले उत्तर , ते म्हणतात "तु हिन कुळातील असल्यामुळे तुला माझ्याकडून विद्या घेता येणार नाही" . निट लक्ष दिले तर याठीकाणी एकलव्याला द्रोणाचार्यांकडून विद्या न मिळण्याचे कारण म्हणजे ...’तो हिन कुळातिल होता’ म्हणुन नव्हे , तर ’द्रोणाचार्यांना तेथील राजांनी तो अधीकार दिला नव्हता म्हणुन’ असे आहे . द्रोणाचार्य त्या त्यावेळी फक्त राजांच्या राजपुत्रांना विद्या देत होते आणि इतरांसाठी कृपाचार्यांची नेमणुक केली होती, द्रोणाचार्यांचा एकलव्य तसेच कर्णाप्रती नाईलाज होता म्हणुन त्यांना शिक्षा नाकारली, ना की त्यांचे कुळ हिन होते म्हणुन. कर्णाने निराश न होता कृपाचार्यांकडे विद्या ग्रहण करण्याच सुरवात केली परंतु एकलव्याने मात्र द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानले असल्यामुळे त्याने इतर कोणाकडून शिक्षा न घेता त्यांचा पुतळा तयार करुन स्वाभ्यासाने धनुर्विद्देचे सर्वोच्च शिखर गाठले, तोच प्रकार कर्णाचा कृपाचार्यांच्या हाताखाली शिक्षण घेवुनही त्याने अर्जुनाची बरोबरी गाठली. या हिन कुळाहीत समजले जाणारे असे दोन महान येद्धे [कर्ण हा क्षत्रीय होता हे नंतर समजले परंतु तो सुतपुत्र होता आणि त्याचप्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये झाले होते हे आपल्याला विसरुन चालणार नाही] यांचा आदर्श समोर घेवुन स्वत:ची आणि स्वत:च्या समाजाची प्रगती कशी होईल हे न पाहता काहीतरी कारणे काढून आपापसांत भांडणे लावली जात आहेत, काय म्हणावे अशांना.